हा मुलगा दहावीत शिकत होता. त्याने आई-वडिलांकडे मोबाईलसाठी तगादा लावला होता. परंतु परीक्षेचे दिवस जवळ आल्याने पालकांनी त्याची ही मागणी फेटळाली. त्यामुळे त्याने शेतातील निंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
ग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. परंतु मोबाईलसारखे गॅझेट्स लहान मुलांच्या मनावर किती खोल परिणाम करतात, हे या घटनेवरुन दिसून येतं.