Breaking News LIVE : अरबी समुद्रातील तोत्के चक्रीवादळाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रशासनाला सूचना
Breaking News LIVE Updates, 14 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील.देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये..
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 15 May 2021 12:02 AM
पार्श्वभूमी
मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावर केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची घडामोड हाती आली आहे. 102 वी घटना दुरुस्ती संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने दिलेल्या निकालावर केंद्र सरकारची पुनर्विचार...More
मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावर केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची घडामोड हाती आली आहे. 102 वी घटना दुरुस्ती संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने दिलेल्या निकालावर केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. राज्यांना ओबीसी लिस्टमध्ये समावेशाचे अधिकार नाहीत अशा पद्धतीचा निर्णय खंडपीठाने दिला होता. 102 व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना झाली.या आयोगाच्या स्थापनेनंतर राज्यांना आरक्षणाचे अधिकार आहेत की नाहीत याबाबत बराच उहापोह झाला होता. खंडपीठाने हे अधिकार आता राज्यांना उरले नसल्याचा निर्वाळा दिला होता. पण केंद्र सरकार पुनर्विचार याचिका दाखल करून या निर्णयाला आव्हान देत आहे. म्हणजे एक प्रकारे राज्यांना हे अधिकार आहेत असं केंद्राचं सांगणं आहे.गुरुवारी राज्यात 42582 नव्या रुग्णांची नोंद तर 54535 रुग्ण बरे होऊन घरीराज्यात कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. नवीन रुग्णांची आकडेवारी कमी होत असून तुलनेनं डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची आकडेवारी जास्त येत आहे. आज राज्यात 42582 नव्या रुग्णांची नोंद तर 54535 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 4654731 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 88.34% एवढे झाले आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 17 मे रोजी मुंबई-ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' जारीअरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 17 मे रोजी मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबई आणि ठाण्याला हवामान विभागाकडून 17 मे रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 16 आणि 17 मे रोजी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
अरबी समुद्रातील तोत्के चक्रीवादळाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना
अरबी समुद्रातील तोत्के चक्रीवादळाच्या अनुषंगाने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवावी तसेच विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करावे अशा सुचना प्रशासनास दिल्या. विशेषत: पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार असल्याने जिल्हाधिकारी यांनी सज्ज राहावे व मनुष्यबळ तसेच्या साधन सामुग्री तयार ठेवावी असेही मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीत सांगितले. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या पूर्वतयारीच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा घेतला
वर्ध्यात आता रेमडेसिवीरनंतर अम्फोटेरिसिन बी हे इंजेक्शन बनवण्याची मंजुरी
वर्धा : वर्ध्यात आता रेमडेसिवीरनंतर अम्फोटेरिसिन बी हे इंजेक्शन बनवण्याची मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने यास परवानगी मिळाली असल्याचे जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीचे संचालक डॉ. महेंद्र क्षीरसागर यांची माहिती. येत्या 15 दिवसात या इंजेक्शन बनवण्याची प्रक्रियेला सुरूवात होणार असल्याची माहिती. ब्लॅक फंगस इन्फेक्शनवर याचा वापर होतो . लवकरच उत्पादनाला सुरुवात होणार असून केवळ 1200 ते 1400 रुपयात हे इंजेक्शन उपलब्ध होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कंपनीला या उत्पादन निर्मितीबाबत विचारणा केली होती . नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने आणखी एका औषधीची निर्मिती येथे होणार आहे . दररोज 20 हजार इंजेक्शन येथे तयार होणार असल्याची माहिती डॉक्टर क्षीरसागर यांनी दिली
उद्या 15 व परवा 16 मे रोजी संपूर्ण राज्यात लसीकरण प्रक्रिया बंद
Corona vaccination Update : उद्या 15 व परवा 16 मे रोजी संपूर्ण राज्यात लसीकरण प्रक्रिया बंद, कोविन अॅप अपडेशनसाठी बंद, प्रशासनाकडून सूचना #Mumbai #coronavaccination https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-may-14-2021-986385
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई उच्च न्यायालयात, मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्यासोबत सदिच्छा भेट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्यासोबत सदिच्छा भेट असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांसह मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहलही हायकोर्टात उपस्थित असल्याची माहिती मिळत आहेत.
बुलढाणा जिल्ह्यात खाजगी कोविड रुग्णालयाच्या डॉक्टरांचे सामुहिक राजीनामे
बुलढाणा जिल्ह्यात खाजगी कोविड रुग्णालयातील डॉक्टरांनी सामुहिक राजीनामे दिल्याची घटना घडली आहे. कामात राजकीय हस्तक्षेप वाढल्याने तणावाखाली काम करावं लागत असल्याचा आरोप त्यांच्यावतीनं करण्यात येतोय तसेच डॉक्टरांना मानसिक त्रास दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. जवळपास 13 खाजगी कोविड रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पालकमंत्र्याकडे राजीनामे दिले आहेत.
लातूर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार, अमावस्येच्या रात्री गुप्तधनाच्या शोधासाठी पूजा
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सांगवी घुगी येथील कारभारी नावाच्या शेतकऱ्याच्या शेतात सलाउद्दीन तांबोळी हा सालगड़ी म्हणून कामास आहे. त्याने जवळगा शिवारातील गोपाळराव पाटिल यांच्या शेतात गुप्तधन आहे, ते गुप्तधन काढण्यसाठी काही मांत्रिक आणि सहकारी एकत्र केले .यासाठी उमरगा तालुक्यातील रहिवासी असलेला मुख्य मांत्रिक होता लालू बाबू शेख आणि खड्डा खोदन्यासाठी मदतीचा हात देणारे आठ जण. अमावास्येला ठरलेल्या वेळी पूजा सुरु झाली. मात्र याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ कारवाई केली त्यांना जेरबंद केले आहे. जादूटोना प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
एकूण कोरोनाबाधित रुग्ण : दोन कोटी 40 लाख 46 हजार 809 एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 79 हजार 599 एकूण सक्रिय रुग्ण : 37 लाख 04 हजार 893 कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 2 लाख 62 हजार 317 देशातील एकूण लसीकरण : 17 कोटी 92 लाख 98 हजार 584
India Corona Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 4 हजारांहून अधिक मृत्यू, तर 3.43 लाख नवे रुग्ण
India Corona Cases Today : आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 343,144 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 4000 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 3,44,776 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी बुधवारी 362,727 नव्या बाधितांची नोंद झाली होती.
Akshaya Tritiya 2021 : अक्षयतृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात आंबा महोत्सव
पुणे : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुण्यातील पुणेकरांचे लाडके दैवत असलेल्या दगडुशेठ गणपतीला हापूस आंब्याची आरास करण्यात आली. दरवर्षी ही आरास मोठ्या प्रमाणात केली जाते. पण कोरोनाचे सावट पाहता साध्या पद्धतीनं यावर्षी अक्षयतृतीया मंदिरात साजरी केली जात आहे. दुसऱ्या दिवशी हा आंब्याचा प्रसाद ससुन रुग्णालयात रुग्णांना दिला जातो. कोरोनाचे सावट पाहता मंदिरात भाविकांना प्रवेश बंदी करण्यात आली असून रोडवरुनच भाविकांनी बाप्पाचे दर्शन घेतले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे अक्षय्य तृतीयेनिमित्त गणपती मंदिरात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोविडमुळे साध्या पद्धतीने आंबा महोत्सव होणार आहे. यावेळी दगडूशेठ गणपतीला 1,111 हापूस आंब्याची आरास करण्यात आली.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून पेट्रोल व डिझेल दरात सतत वाढ होत असल्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसून आर्थिक परिस्थिती डबघाईला आलीय. लॉकडाऊनमुळे आधीच घाईला आलेल्या नागरिकांना आता पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या नवीन संकटाला तोंड द्यावे लागत आहे. आज नांदेड जिल्ह्यात पेट्रोल चे दर 100 रुपये 82 पैसे तर डिझेल दर 90 रुपये 85 पैशांवर गेलंय. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसलीय. काल पेट्रोल चे दर पेट्रोल 100 रुपये 54 पैसे होते, तर डिझेल 90 रुपये 49 पैसे होते. तर आज पेट्रोल मध्ये 32 पैशाने तर डिझेल मध्ये 36 पैशाने वाढ झालीय
पंढरपूर : आज वैशाख शुद्ध तृतीय अर्थात अक्षयतृतीया .. हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या दिवसाला आज विठ्ठल मंदिरात 6501 आंब्याची आकर्षक आरास करण्यात आली . पुणे येथील भाविक विनायकशेठ काची ( बुंदेला ) यांनी आजच्या मुहूर्तावर विठ्ठल मंदिराला सजवण्यासाठी 6501 हापूस आंबे आणि इतर फळे विठ्ठल मंदिराला अर्पण केली आहेत . पुण्यातील किसन सीताराम ब्रदर्स यांनी या फळांची मंदिरात अतिशय आकर्षक पद्धतीने सजावट करीत विठ्ठल मंदिराला अमराईचे रूप दिले आहे . आज अक्षयतृतीयेला आंब्याचे महत्व असल्याने विनायकशेठ काही यांनी हे आंबे अर्पण करून सजावटीची सेवा दिली आहे . विठ्ठल रुक्मिणी गाभारा , चौखांबी आणि सोळखांबी येथे या शेकडो आंब्याच्या सजावटीमुळे विठ्ठल मंदिर आंब्याच्या गंधानं दरवळून निघालं आहे.
कोरोनाबाधित पीएसआयच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते पीपीई किट घालून कोविड वॉर्डमध्ये
कोविडचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णास उपचारांबरोबरच मानसिक आधाराची ही तितकीच गरज असते. उपचार व्यवस्थित असताना सुद्धा मानसिक आधार न मिळाल्यास रुग्ण खचून जातो. या गोष्टीचे भान ठेवून सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी उपचार घेत असलेल्या आपल्या पोलीस अधिकाऱ्याची पीपीई किट घालून तब्येतीची विचारपूस केली. वळसंग पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश ढाले यांना कर्तव्य बजावत असताना काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे त्यांना सोलापुरातील एका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ढाले यांच्या तब्येतीची विचारपूस करायला थेट तेजस्वी सातपुते थेट कोविड वॉर्डमध्ये पीपीई किट परिधान करुन आल्या. आपल्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी प्रत्यक्षात पोलीस अधीक्षक कोविड वॉर्डमध्ये आल्याचे पाहून प्रकाश ढाले यांचे मनोधैर्य उंचावले. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ढाले यांची आस्थेने चौकशी केली. त्यांना जास्तीत जास्त आराम करत लवकर बरे होण्याचा सल्ला दिला.
कळंबा कारागृहातील कोरोना बाधित दोन कैद्यांचे पलायन
कळंबा कारागृहातील कोरोना बाधित दोन कैद्यांचे पलायन. बंदोबस्तासाठी नियुक्त असलेल्या पोलिसांच्या डोळ्यादेखत कैदी पसार. एकाच वेळी दोन कैदी पसार झाले कारागृह प्रशासनात खळबळ. हत्येच्या गुन्ह्यात अंडर ट्रायल असलेल्या दोन कैद्यांना कोरोना लागण झाली. आयटीआय इथल्या कोविड सेन्टरमधून रात्री साडेबारा वाजता खिडकीचे गज कापून कैदी पसार. याप्रकरणी रात्री उशिरा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद.
सिंधुदुर्ग : क्रिकेटपटू पृथ्वी शॉचा विनापास मुंबईहून कोल्हापूरमार्गे गोव्याच्या दिशेने प्रवास, आंबोली पोलिसांच्या जागरूकतेमुळे उघड
सिंधुदुर्ग : राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत कडक लॉकडाऊन असताना देखील भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ विनापास मुंबईहून कोल्हापूर मार्गे गोव्याला जात होता. मात्र आंबोली पोलिसांनी ई-पासची विचारणा केली असता पृथ्वी शॉ जवळ कोणत्याही प्रकारचा पास नसल्याने पृथ्वीचा गोंधळ उडाला. ई पास असल्याशिवाय पुढे जाता येणार नाही असं पोलिसांनी सांगितले त्यानंतर ऑनलाईन पास काढून पृथ्वी गोव्याकडे मार्गस्थ झाला. मुंबईहून प्रवास करताना पृथ्वीला कुठेही पास विचारण्यात आला नाही. मात्र आंबोली पोलिसांच्या जागरूकतेमुळे क्रिकेटरला एक तास आंबोलीत थांबून राहावे लागले.
बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास आंबोली पोलीस दुरक्षेत्राजवळ आली असता आरोग्य विभागाने त्यांची आरोग्य तपासणी केली. त्यानंतर पोलिसांनी ई पास तपासणीसाठी मागितला असता त्याच्या जवळ कोणत्याही प्रकारचा पास नसल्याचे सांगितले. त्यामुळे आंबोली पोलिसांनी पास शिवाय जाता येणार नाही असे सांगत पोलिसांनी त्याला तिथेच थांबवले. पृथ्वी शॉने आंबोलीतूनच ऑनलाईन पध्दतीने ई पाससाठी अर्ज केला. त्यानंतर एक तासाने त्याचा पास तयार होऊन मोबाईलवर आल्यावर तो पास आंबोली पोलिसांना दाखवून गोव्याकडे मार्गस्थ झाला.
पुणे,अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या यशवंत जलाशयातील पाण्याची पातळी 13 मेला उणे निशाणीच्याही खाली
पुणे,अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या यशवंत जलाशयातील पाण्याची पातळी 13 मेला उणे(-)( मायनस) साठ्या मध्ये गेली आहे. यापुढे कालवा, बोगदा , अनेक उपसा सिंचन योजना, उद्योगधंदे या सर्वासाठी मृतसाठ्यातील पाण्याचा वापर होणार आहे.. उजनी धरणाचा मृतसाठा हा 63 टीएमसी आहे. मागीलवर्षी 13 मे रोजी उजनी धरण उणे ( मायनस) मध्ये गेले होते. विशेष म्हणजे पाण्याचा मृतसाठा हा उपयुक्त साठ्याच्या जादा असणारे उजनी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे.