Nitesh Rane : राष्ट्रवादीचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप (BJP) आक्रमक झालीय. ठाकरे सरकारकडून मलिकांचा त्वरित राजीनामा घेण्यात यावा या मागणीसाठी आज मुंबईत विराट मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी भाजपचे प्रमुख नेते आझाद मैदानावर दाखल झाले असून त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. मोर्च्याचे नेतृत्व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करत असून राणीची बाग ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आहे, भाजप आमदार नितेश राणे यांनी मोर्च्याला संबोधित करताना महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.


मविआवर नागासारखे बसलेल्या शरद पवारांना हा संदेश मिळालाच पाहिजे


महाविकास आघाडीचे मंत्री, घरातून न निघालेले मुख्यमंत्री, मविआवर नागासारखे बसलेले शरद पवारांना हा संदेश मिळालाच पाहिजे, मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहाल तर भाजपाचा कार्यकर्ता तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही
राजीनामा का मागतोय? अंडरवल्ड डॉन दाऊद इब्राहिम सोबत नवाब मलिकांनी व्यवहार केल्यामुळे हा राजीनामा मागतोय.


मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक


"माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा शरद पवार यांनी लगेच घेतला. मग नवाब मलिक यांना तो न्याय का नाही? अनिल देशमुख हे हिंदु मराठा आहेत म्हणून त्यांच्यावर अन्याय केला का? अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. परंतु, नवाब मलिक यांच्यावर त्यापेक्षा गंभीर आरोप आहेत. मग मलिक यांचा शरद पवार यांनी राजीनामा का घेतला नाही? असा प्रश्न भाजप आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला. काल मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात नितेश राणे बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.  . 


...'तर आम्ही नवाब मलिक यांच्या कानफटीत मारली असती'
"पोलीस हतबल आहेत. दाऊद बरोबर फिरणाऱ्यांना त्यांना सलाम ठोकावा लागतो. ईडीने अटक केल्यानंतर नवाब मलिक कसे हातवारे करत होते. पोलिसांना थोडं बाजूला ठेवलं असतं तर आम्हीच नवाब मलिक यांच्या कानफटीत मारली असती, असं वक्तव्य राणे यांनी यावेळी केलं होतं