चंद्रपूर  : शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीका केली होती. यावर भाजपकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजप नेते आमदार सुधीर मुनगुंटीवार यांनी म्हटलं आहे की,  शिवसेना वर्धापन दिनाचे उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे सत्ता प्रमुखाचे नव्हे तर गँग प्रमुखाचे भाषण आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं की, 2 दिवसाआधी आपण गुंड आहोत म्हणून सांगितले. आता काँग्रेसला स्वबळाच्या नाऱ्यामुळे जोड्याने मारण्याची भाषा केली जात असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. हिंदुत्वाची व्याख्या भारताला आधीच कळली आहे, तुम्ही सांगण्याची गरज नाही, मात्र शेवटी शिवसेनेची त्यातली भूमिका कोणती आहे? असा सवाल मुनगंटीवार यांनी विचारला. शिवसेना वर्धापनदिन भाषण केवळ खुर्चीभोवती फिरले आणि हे भाषण कार्यकर्त्यांपुढे आपण घेतलेल्या भूमिकेचे उदात्तीकरण असल्याची टीका त्यांनी केली.


काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 


शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, खरं म्हणजे अनेक राजकीय पक्ष या कोरोना काळात सुद्धा स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ. ताकद तर कमावलीच पाहिजे. पण स्वबळ म्हणजे काय? स्वबळ केवळ निवडणुका लढवण्यापुरतं असू नये. निवडणुका येतात आणि जातात. स्वबळ हे अभिमानाचं, स्वाभिमानाचं असावं असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ. स्वबळावर लढणं हा आमचा हक्क आहे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 


Uddhav Thackeray Speech: 'अनेक पक्ष स्वबळाचा नारा देताहेत, आपणही देऊ, स्वबळ हा आपला हक्क' : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 


आपलं काम बोलतंय, ते पाहून अनेकांच्या पोटात मुरडा 
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, असं भाषण करण कठीण आहे.  समोर आपले शिवसैनिक नसताना मी एकतर्फी बोलतोय.  राज्यात आज आपलं काम बोलतंय. अनेकांच्या पोटात त्यामुळे मुरडा येतोय. त्यांचं ते पाहतील, त्यांना औषध द्यायला मी डॉक्टर नाही. पण राजकीय औषध देईन. सत्ता न मिळवल्यानं अनेकांचा जीव कासावीस होतोय, असं ते म्हणाले.


CM Uddhav Thackeray : 'सरकारच्या कामानं अनेकांची पोटदुखी, मी राजकीय औषध देईन' मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील दहा महत्वाचे मुद्दे 


मुख्यमंत्र्यांचं स्वबळावर भाष्य
अनेक राजकीय पक्ष या कोरोना काळात सुद्धा स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ. ताकद तर कमावलीच पाहिजे. पण स्वबळ म्हणजे काय? स्वबळ केवळ निवडणुका लढवण्यापुरतं असू नये. निवडणुका येतात आणि जातात. स्वबळ हे अभिमानाचं, स्वाभिमानाचं असावं असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ. स्वबळावर लढणं हा आमचा हक्क आहे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.  ते म्हणाले की, स्वबळ म्हणजे फक्त निवडणुका लढणे नाही तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे म्हणजे स्वबळ आहे. ज्यावेळी शिवसेना स्थापन झाली तेंव्हा मराठी माणूस क्षुल्लक होता. मान सोडाच परंतु अपमान सहन करत होता. शिवसेना तेंव्हा स्थापन झाली नसती तर... जे माझे आजोबा सांगायचे आणि शिवसेनाप्रमुख सांगायचे ते म्हणायचे आत्मविश्वास आणि आत्मबळ महत्त्वाचं आहे, असं ठाकरे म्हणाले.