रविवारी स्मशानभूमीत रक्षाविसर्जनासाठी जागाच नसल्यानं दोन मृतदेहांना घेऊन नातेवाईकांना अक्षरश: रस्त्यावर वाट पाहावी लागली. त्यामुळे आक्रमक नगरसेवकांनी थेट महापालिकेतील सभेतच तिरडी मोर्चा काढून आंदोलन केले.
दरम्यान, या गोंधळानंतर समस्येवर कसा तोडगा निघतो याकडं सर्वांचे लक्ष लागले आहे. पंचांगंगा स्मशान भूमीचा प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.