आमच्या मुलीला फोन का केला, असा जाब विचारत संबंधित तरुणीच्या कुटुंबीयांनी संतोष रसाळ नावाच्या तरुणाचं घर गाठलं. मात्र तो घरी नसल्यामुळे त्याला आपल्या घरी बोलावून तिच्या पालकांनी बेदम मारहाण केली. इतकंच नाही, तर तरुणाच्या आई-वडिलांना आपल्या घरी बोलावून मुलाला घेऊन जाण्यास सांगितलं.
या घडलेल्या प्रकारामुळेच संतोषने गळफास घेऊन आत्महत्या केली, असा आरोप संतोषच्या वडिलांनी केला आहे. बारामती तालुक्यातील जळगाव कडेपठार मध्ये ही घटना घडली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.