गोकुळाष्टमीच्या निमित्ताने दरवर्षी विश्व हिंदू परिषदेतर्फे शोभायात्रा काढण्यात येते. या शोभायात्रेत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हातात तलवारी घेऊन भरपूर नारेबाजी केली. इतकंच नाही तर काही जणांच्या हाती परशूसुद्धा होते.
शस्त्र हवेत फिरवणे आणि त्यांचे अशाप्रकारे प्रदर्शन करणे बेकायदेशीर असल्याचं पोलिसांनी कार्यकर्त्यांना सांगितलं, तेव्हा हा प्रकार थांबला. गेल्या वर्षीही अशाच शस्त्र प्रदर्शनासाठी बजरंग दलाला टीकेला सामोरं जावं लागलं होतं. मात्र यंदाही त्याची पुनरावृत्ती झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.