औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील तांदूळवाडीमध्ये 17 वर्षीय प्रियंका मोरे राहत होती. गावातील तरुण तिला फोन करुन नेहमी त्रास देते असत. त्याचप्रमाणे घरी कुणी नसल्यावर घरी येऊनही त्रास देत असत, असं तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं.
गावगुंडाच्या त्रासाला कंटाळूनच प्रियंकाने आत्महत्या केली, असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.
प्रियंकाने चार दिवसापूर्वी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र वेळीच उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचला होता. परंतु त्यानंतर प्रियंकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.