औरंगाबाद : औरंगाबादमधील फटाका मार्केटला लागलेल्या आगीमागचं नेमक कारण काय? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं आव्हान आता सरकारी यंत्रणांसमोर उभ ठाकलं आहे. औरंगाबादच्या फटाका मार्केटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.


शॉर्ट सर्किट झाल्यास फ्यूज उडतो किंवा इलेक्ट्रिक मीटरचा कंडेन्सर शॉर्ट होतो. मात्र औरंगाबादच्या दुर्घटनेदरम्यान तसा कोणताही प्रकार घडला नसल्याचं मत उर्जातज्ज्ञ मुजावर यांनी व्यक्त केलं आहे. दुर्घटनेच्या ठिकाणावरचा इलेक्ट्रिक मीटर तपासासाठी फॉरेन्सिक टीमकडे पाठवण्यात आला आहे.

फटाका मार्केट दुर्घटनेप्रकरणी औरंगाबाद अग्निशमन दलाचे प्रमुख शिवाजी झनझन यांचं निलंबन करण्यात आलं आहे. अग्निशमन दलाच्या हलगर्जीमुळे औरंगाबादच्या फटाका मार्केटमधील आग भडकल्याचा निष्कर्ष पालिका आयुक्तांनी काढला आहे.

आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्याच तातडीने पोहोचणं गरजेचं होतं. मात्र अग्निशमन दलाच्या गाड्या तब्बल 40 मिनिटांनंतर पोहोचल्या. यामुळे दुकानांना लागलेली आग मोठ्या प्रमाणात भडकली. यामध्ये कोट्यवधींचं नुकसान झालं. या सर्व घटनेला जबाबदार धरत महापालिका आयुक्त बकोरियांनी अग्निशमन दल प्रमुख शिवाजी झनझन यांचं निलंबन केलं.

घटना काय घडली?

औरंगाबादमधील जिल्हा परिषदेच्या परिसरात फटाक्यांची जवळपास 200 दुकानं जळून बेचिराख झाली, तर 112 वाहनं जळून खाक झाली. नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी साडे अकराच्या सुमारास फटाक्यांच्या दुकानांनी अचानक पेट घेतला. कानठळ्या बसवणाऱ्या आवाजानं आगीची भीषणता काही क्षणातच जाणवून दिली.

शहराच्या मधोमध रहिवाशी ही दुकानं असल्याचं याची दाहकत चांगलीच जाणवली. शेकडो छोट्या-मोठ्या वाहनांची अक्षरक्षः राख होऊन कोट्यवधींचं नुकसान झालं. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

संबंधित बातम्या:


औरंगाबाद अग्नितांडव : अग्निशमन दलाचे प्रमुख निलंबित


असंवेदनशीलतेचा कळस, बेचिराख फटाका मार्केट बनलं सेल्फी पॉईंट


औरंगाबादमधल्या अग्नितांडवाला जबाबदार कोण? 


औरंगाबादमध्ये अग्नितांडव, 142 फटाक्यांची दुकानं पेटली


VIDEO : औरंगाबादमधील अग्नितांडवाची एक्स्लुझिव्ह दृश्यं


अग्नितांडव : औरंगाबादमध्ये नेमकं काय घडलं?