काँग्रेसच्या काळात तात्काळ कर्जमाफी : खा. आनंदराव अडसूळ
एबीपी माझा वेब टीम | 11 Sep 2017 07:02 PM (IST)
या सरकारला जास्त अक्कल आहे. यामुळे अद्यापही कर्जमुक्ती मिळालेली नाही. अशी टीका शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी केली.
अमरावती : काँग्रेसच्या काळात तात्काळ कर्जमाफी मिळत होती, असं वक्तव्य अमरावतीचे शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी केलं आहे. शिवसेनेच्या कर्जमुक्तीच्या आंदोलनावेळी भाजपवर टीका करताना अडसूळांनी काँग्रेसची बाजू घेतली. या सरकारला जास्त अक्कल आहे. यामुळे अद्यापही कर्जमुक्ती मिळालेली नाही. मात्र काँग्रेसच्या काळात तात्काळ कर्जमुक्ती मिळत होती, अशी टीका खासदार आनंदराव अडसूळ यांनी केली.