14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. तो दिवस विजयादशमीचा होता. तेव्हापासून विजयादशमीला धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. त्यामुळे दरवर्षी विजयादशमीला देशाच्या कानाकोपऱ्यातून बौद्ध बांधव दीक्षाभूमीवर एकवटतात.
संध्याकाळी धम्म प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राज्य आणि केंद्र सरकारचे अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.