..तर आम्ही चंद्रकांतदादांना मुख्यमंत्री करु : अजित पवार
शेतकरी कर्जमाफीची अचानक उपरती कुठून आली? आंदोलन काय करता कर्जमाफी करा, कर्जमाफी शिवाय सभागृहाचं कामकाज होऊ देणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला.
कोणीही शब्दांचे खेळ करण्याचे प्रयत्न करु नये. आम्ही कर्जमाफीची मागणी श्रेयासाठी करत नाही. पाण्याची पातळी किती खोल जातेय. 'जलयुक्त शिवार'चा टेंभा मिरवला, पण तरीही टँकरची मागणी होतेय, जाहिरातबाजी आणि घोषणाबाजी करुन प्रश्न सुटत नाही, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केला. सरकार गाजर दाखवत आहे. निवडणुकीचे निकाल लागले, आता जनतेचे प्रश्नांना अग्रक्रम द्या, अशी मागणीही अजित पवारांनी केली. संबंधित बातम्या