आदित्य ठाकरे म्हणाले की, इंटर्नलच्या गुणांचा खूप मोठा परिणाम होतो. काल मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्यासंदर्भात तसे आदेश दिले आहेत. तसेच यंदा अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे इंटर्नलच्या गुणांमुळे नुकसान होऊ नये, यासाठी एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी तुकडी करावी, अशी मागणीदेखील आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे. त्यासंदर्भात विचार सुरु आहे.
आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, इंटर्नलच्या गुणांअभावी यंदा राज्याचा निकाल कमी लागला आहे. त्यामुळे एस. एस. सी. बोर्डाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळणार की नाही? हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा इंटर्नल गुण सुरु करावे, ही मागणी मांडली आहे.