मुंबई : युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे. जळगाव जिल्ह्यातून जनआशीर्वाद यात्रेचा प्रारंभ होईल. यात्रेच्या माध्यमातून जनतेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे करणार आहेत.


ज्या मतदारांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मतदान केले, त्यांचे आभार मानण्यासाठी आणि ज्यांनी मतदान नाही केलं, त्यांची मनं जिंकण्यासाठी आदित्य ठाकरेंनी ही यात्रा आयोजित केली आहे. पहिल्या टप्प्यात 18 ते 22 जुलै या पाच दिवसांच्या काळात जळगाव-नाशिक-धुळे-अहमदनगर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहचण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असेल.

जन आशीर्वाद यात्रा हा साधारण चार हजार किलोमीटरचा प्रवास आदित्य ठाकरे करणार आहेत. समाजातील प्रत्येक घटक, युवाशक्तीशी संवाद साधण्याचा प्रयत्न आदित्य करतील.

18 जुलै - जळगाव
19 जुलै - धुळे, मालेगाव
20 जुलै - नाशिक शहर
21 जुलै - नाशिक ग्रामीण, नगर
22 जुलै - नगर, श्रीरामपूर, शिर्डी

येत्या काळात आदित्य ठाकरे शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा दौरा त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आदित्य ठाकरे गेल्या काही काळात राजकीयदृष्ट्या सक्रीय झाले आहेत.

Aditya Thackeray | दिशा पाटनीच्या प्रश्नाला उत्तर देण्यास नकार, आदित्य ठाकरेंनी जोडले हात | ABP Majha



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याआधीच महाराष्ट्रात विकास यात्रा जाहीर केली आहे. ऑगस्ट महिन्यात फडणवीस ‘फिर एक बार शिवशाही सरकार’ ही विकास यात्रा काढणार आहेत.
संबंधित बातम्या

मुंबईत येत्या काळात 500 इलेक्ट्रीक बेस्ट बस सुरु होणार : आदित्य ठाकरे

डिनर डेटवर गेलेल्या आदित्य ठाकरे आणि दिशा पटानीचा वाढदिवसही एकाच दिवशी!

"मी निवडणूक लढवावी की नाही याचा निर्णय उद्धव साहेब घेतील," : आदित्य ठाकरे

माझ्या राजकीय निर्णयापेक्षा दुष्काळ निवारण महत्त्वाचे- आदित्य ठाकरे