सांगली : पंढरपूरहून विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भविकांवर काळाने घाला घातला. मिरज-पंढरपूर मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 भाविकांचा जागीच मृत्यू झाला.


सांगलीतील कवठेमहाकाळ तालुक्यातील आगळगाव फाट्याजवळ पहाटे चार वाजता भीषण दुर्घटना घडली. पंढरपूरहून विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 10 जण जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये दोन लहान मुले, 1 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. सर्वजण कोल्हापुरातील माले गावातील रहिवाशी आहेत.

पंढरपूरहून परतत असताना मिरज-पंढरपूर मार्गावर भाविकांच्या मिनी ट्रॅव्हल्सने रस्त्यावर उभा असलेल्या वाळूच्या ट्रकला धडक दिल्याने दुर्घटना घडली.