Aaditya Thackeray : तब्बल 20 वर्षांनतर मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी वेगळे झालेले दोन ठाकरे बंधु एकत्र आले आहेत. त्यामुळे आगामी काळात दोन राजकीय पक्ष एकत्र येत निवडणुका सोबत लढवतील अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. मात्र अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि राज ठाकरेंचे (Raj Thackeray) अतिशय विश्वासू आशा बाळा नांदगावकरांनी युतीसंदर्भात मोठं विधान केलं आहे. आतापर्यंत आमची निवडणूक आम्ही एकट्याने लढवली आहे, त्यामुळे आताही वेळ आली तर एकटे निवडणूक लढवू, अशी सूचक प्रतिक्रिया नांदगावकर यांनी दिली. यावर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
5 जुलैला आम्ही एकत्र आलो होतो स्पष्टपणे ते एका गोष्टीसाठी, ती म्हणजे तिसऱ्या भाषेच्या सक्तिविरोधात. निवडणुकांचं वातावरण दिसत आहे. आमच्या बाजूने जे काय महाराष्ट्राच्या मनात आहे ते आम्ही करु असे आदित्य ठाकरे म्हणाले. आम्ही राजकारण पाहत नाही आम्ही महाराष्ट्राच्या हित पाहतो असेही ठाकरे म्हणाले. बाकीच्या पक्षांबद्दल मी काय बोलू शकत नाही असेही ठाकरे म्हणाले.
कांदिवली पूर्वेतील समतानगर येथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शिव संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शाखा क्रमांक 25 च्या वतीने माजी नगरसेवक योगेश भोईर यांच्या माध्यमातून हा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. आमदार आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला. या मेळाव्याला मोठ्यासंखेने पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.
गृहखात काम करतय की नाही हा प्रश्न
काही ना काही या राज्यात घडत चाललं आहे. गृहखात काम करतय की नाही हा प्रश्न असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. परवा चड्डी बनियन गॅंग मधील मुख्य मुक्केबाजावर काय कारवाई झाली? काल आमदार पैशाची बॅग घेऊन बसले काय कारवाई झाली? असे सवाल आदित्य ठाकरेंनी केले. महाराष्ट्राच्या बाजूने आहे ते आम्ही करु बाकीच्या पक्षांबद्दल मी काही बोलू शकत नाही असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्याच पक्षाचे आहेत. सरकार त्यांचं आहे त्यामुळं लाडकी बहिण योजना त्यांना बंद पाडायची आहे. ही योजना फसवी आहे. लोकांना फसवण्यासाठी भाजपाने ही योजना आणली असल्याचे ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: