पुणे : सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि भाषण करताना कुणाच्या मुखातून पक्षाला अडचणीत आणणारे उद्गार निघतील याचा नेम नाही. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्याही बाबतीत असंच झालं आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 65 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर अनेक जनावरं मरण पावली. असं वक्तव्य गिरीष बापटांनी केलं आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजप उमेदवारांना पारदर्शकतेची शपथ देण्यात आली. त्या कार्यक्रमात बोलताना गिरीष बापटांनी फडणवीस सरकारचाच उद्धार केला. मात्र आपण नको ते बोलतोय याची जाणीव झाल्यानंतर बापटांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

पाहा व्हिडिओ :