एकाच कुटुंबातील 6 जणांचे मृतदेह, हत्या की आत्महत्या?
एबीपी माझा वेब टीम | 28 Jun 2016 10:05 AM (IST)

अमरावती : अंजनगांव सुर्जीत एकाच कुटुंबातील सहा जणांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे सर्व मृतदेह काठीपुरा येथील चौहान कुटुंबातील आहेत. एकाच वेळी इतके मृतदेह आढळल्याने ही आत्महत्या आहे की हत्या, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. प्रथमदर्शनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मृतांमध्ये ४ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे.