या कारवाईवेळी अतिशय भयंकर चित्र समोर आलं आहे. वन विभागाच्या वनाशेजारी तात्पुरत्या स्वरूपात मंजूरी मिळालेल्या दोन कारखान्यांऐवजी प्रत्यक्षात सहा कारखाने असल्याचं उघड झालं.
या कारखान्याचे मालकही मुंबई आणि हैराबादचे रहिवाशी असल्याचं उघड झालं आहे. रोज 20 टन माल एका-एका कारखान्यातून मुंबईला पाठवला जात होता. अतिशय दुर्गर्धींमुळे वैतागलेल्या ग्रामस्थांनी 10 वर्षे लढा दिल्यावर आजची ही कारवाई करण्यात आली. या कारवाईवेळी एकाच कारखान्याचे मालक उपस्थित होते. बाकीचे मालक आणि परप्रांतीय कामगार पळून गेले. त्या मालकांमी मात्र ग्रामस्थांचे सर्व आरोप फेटाळले असले, तरी हाडांच्या भुकटीपासून काय बनत होते ते माहित नसल्याचं मान्य केलं आहे.