आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास हा अपघात झाला. क्रूझ कार मुंबईहून पुण्याकडे जात असताना मळवलीजवळ हा भीषण अपघात झाला.
रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वेगाने निघालेली ही गाडी स्लिप होऊन कठड्याला जोरदार धडकली. प्रचंड वेग आणि त्यातच पाऊस असल्याने धडकेनंतर गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला.
या दुर्दैवी अपघातात चार जणांनी जागीच प्राण गमावले तर गंभीर जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.