नव्या आराखड्यानुसार भौतिकशास्त्र (फिजिक्स), रसायनशास्त्र (केमिस्ट्री) आणि जीवशास्त्र (बायोलॉजी) या विषयांचे 100 गुणांपैकी 70 गुण लेखी परीक्षेसाठी तर 30 गुण प्रात्यक्षिक परीक्षा अर्थातच प्रॅक्टिकलसाठी देण्यात येतील. गणित विषयासाठी 80 गुणांची लेखी परीक्षा तर 20 गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येईल.
राज्यातले विद्यार्थी जेईई आणि नीटसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी तयार व्हावेत यासाठी हे बदल करणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.