बीडमध्ये बारावीच्या 1199 उत्तरपत्रिका जळून खाक
एबीपी माझा वेब टीम | 03 Mar 2018 08:44 PM (IST)
1199 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्याने आता शिक्षण विभाग या विद्यार्थ्यास संदर्भात कोणता निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
बीड : केज तालुक्यात बारावीच्या गणिताच्या पेपरच्या उत्तरपत्रिकाच आगीत जळून खाक झाल्या आहेत. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. केज शहरातील गट साधन केंद्रात आज संध्याकाळी आग लागली. या आगीत बारावीच्या आजच्या गणित पेपरच्या 1199 उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. आगीचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही. 1199 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्याने आता शिक्षण विभाग या विद्यार्थ्यास संदर्भात कोणता निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.