Rahul Gandhi In Kolhapur : जम्मू-काश्मीर आणि हरियाणापाठोपाठ लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी आरक्षण आणि संविधानाच्या मुद्यावर महाराष्ट्राच्या आक्रमक प्रचार करतील असे चित्र आहे. 5 ऑक्टोबरला हरियाणा विधानसभेसाठी मतदान संपणार आहे, त्याच दिवशी राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर असतील. सध्याचे कोल्हापूरचे काँग्रेसचे खासदार शाहू महाराज शाहू महाराज घराण्याेच वंशज आहेत. राहुल गांधी यांच्या या कार्यक्रमास महाराष्ट्रातील सामाजिक न्यायाशी संबंधित सर्व दलित आणि आदिवासी संघटनांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. आगामी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा महत्वाचा दौरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी,  अमित शाह यांच्या पाठोपाठ काँग्रेस नेते राहुल गांधी यांचाही महाराष्ट्र दौरा वाढला आहे. 


आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांनी वाढवण्याची मागणी करण्याची शक्यता


अमेरिकेतील आरक्षणाच्या वक्तव्यावरून भाजपने राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला असला, तरी जातीय जनगणनेच्या मागणीचा पुनरुच्चार करून आणि आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांनी वाढवण्याची मागणी करण्याची शक्यता आहे. या बैठकीच्या माध्यमातून राहुल गांधींना पक्षाच्या भूमिकेतून बाहेर पडून सामाजिक न्यायाशी जोडायचे आहे. त्याचवेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे बोलले जात आहे.


महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या निवडणुकीची घोषणा करू शकतो, असे बोलले जात आहे. याआधीही राजकीय पक्षांनी आपली राजकीय रणनीती बनवण्यास सुरुवात केली आहे. अंतर्गत जागावाटपावर विचारमंथन केले जात आहे. महाविकास आघाडी (एमव्हीए), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जागावाटपावर प्राथमिक चर्चा पूर्ण केली आहे.  


अमित शाहांनी पश्चिम महाराष्ट्रात शड्डू ठोकला


आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांच्या अंतरावर आल्याने महायुतीसह महाविकास आघाडीमध्ये राज्यात जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये विशेष लक्ष घातलं आहे. पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे या बालेकिल्लांमध्ये कोणत्याही परिस्थितीत यश मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या 58 जागा येतात. यामध्ये अवघ्या 17 जागांवर भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे हे अंतर भरून काढण्यासाठी विशेष करून लक्ष घालण्यात आलं आहे. महायुतीला लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला ही कसर भरून काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या