Accident News :  विजयपुर-संकेश्वर राष्ट्रीय महामार्गावर अथणी इथं भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात एका लॉरी, पिकअप ट्रक, इनोव्हा आणि स्कॉर्पिओमध्ये झाला आहे. या अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी गावातील महेश सुभाष गाताडे (30), शिरोळ तालुक्यातील पुडवाड गावातील शिवम युवराज चव्हाण (24) आणि सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कवलापूर गावातील सचिन विलास माळी (42) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अथणी येथील बणजवाड कॉलेजजवळ ही दुर्घटना घडली आहे. कागवाडकडून विटा वाहून नेणारी लॉरी आणि अथणीहून कागवाडकडे जाणाऱ्या पिकअप वाहनात हा अपघात झाला आहे. जखमी चालक आणि क्लिनर मदतीसाठी याचना करत होते. हे पाहून स्कॉर्पिओ चालकाने आपले वाहन बाजूला केले आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतू अथणीकडून येणाऱ्या इनोव्हा कारने त्यालाच धडक दिली आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अथणी सार्वजनिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Pune Accident: कारची चावी तशीच राहिली अन् पुढे नको ते घडलं, पुण्यात 11 विद्यार्थ्यांना उडवलं; तिघांना अटक, पुण्यातील सदाशिव पेठेत काय घडलं?