योगी प्रह्लाद यांचा दावा होता की, त्यांना अन्न-जल ग्रहण करण्याची गरज नाही कारण देवी मां ने त्यांना जीवंत ठेवलं आहे. त्यांच्या शिष्यांनी सांगितलं की, 'माताजी यांनी काही दिवसांआधी आपल्या मूळ स्थानावर घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळं त्यांना त्यांच्या गावी चराडा इथं घेऊन गेलो होतो. त्यांनी तिथंच शेवटचा श्वास घेतला. आज त्यांच्या आश्रमात त्यांचा पार्थिव देह ठेवला जाईल. उद्या, गुरुवारी आश्रमातच त्यांना समाधी दिली जाईल.'
योगी जानी यांची देवी मां अंबेवर खूप श्रद्धा होती. त्यामुळं ते नेहमी चुनरी परिधान करायचे. त्यामुळं ते चुनरीवाला माताजी या नावाने देखील परिचित होते.
त्यांचा दावा होता की, आई अंबेची माझ्यावर अपार कृपादृष्टी आहे. आईच्या कृपेने माझ्या टाळूतून एका द्रव्याचा स्राव होतो. त्यामुळे मला जगण्यासाठी अन्न पाण्याची गरज लागत नाही. त्यांच्या भक्तांचा दावा आहे की, त्यांनी वयाच्या 14 व्या वर्षापासून खाणं-पिणं वर्ज केलं होतं.
जानी यांनी गुजरात जवळील एका वर्षावनात अंबाजी मंदिराजवळ आश्रम बनवलं होतं. तिथेच ते एका गुहेत ध्यान धारणा करायचे.
2010 साली इंस्टिट्यूट ऑफ फिजियोलोजी अॅंड अलाइड सायंसेस (डीआयपीएएस) च्या शास्त्रज्ञांनी आणि काही डॉक्टरांनी योगी जानी यांच्या दाव्याबाबत अभ्यास केला. 15 दिवस त्यांनी जानी यांचं निरीक्षण केलं होतं. डीआयपीएएसकडून सांगण्यात आलं होतं की, भूक आणि पाण्यापासून वाचण्यासाठी ते काहीतरी अतिरेक करतात.