Coronavirus in India: भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. रोजच्या कोरोनाबाधितांची संख्या आता साडेतीन लाखांच्या वर जात आहे. मृत्यूच्या प्रमाणातही जागतिक तुलनेत मोठी वाढ झाली आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली भारतातील परिस्थिती ही अत्यंत वाईट असून हृदय पिळवटून टाकणारी असल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस घेब्रेयेसस यांनी व्यक्त केलं. 


जगातील अनेक देश कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करत आहेत पण भारतातील परिस्थिती अत्यंत नाजूक बनली आहे असं मत जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस घेब्रेयेसस यांनी व्यक्त केलं. 


 




जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताला मदत
टेड्रोस घेब्रेयेसस यांनी सांगितलं की, भारतातील कोरोनाची स्थिती लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेकडून मदत पुरवण्याचं काम सुरू आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्यासोबतच पीपीई किट्स आणि इतर साहित्यांची मदत भारताता देण्यात येत आहे. भारतातील कोरोनाच्या संकटाला नियंत्रित आणण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे दोन हजारहून जास्त कर्मचारी भारतात काम करत असल्याचं तसेच भारतातील लसीकरणाच्या कार्यक्रमात मदत करत असल्याचं टेड्रोस घेब्रेयेसस यांनी सांगितलं. तसेच जगभरातील इतरही अनेक देशांनी भारताला मदत द्यायला सुरुवात केली आहे.


देशात कोरोना विषाणूचा आकडा अगदी झपाट्यानं वाढू लागला आहे. नव्या कोरोनाबाधितांचा आकडा काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. रविवारी भारतात एकूण 3 लाख 52 हजार 991 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा ठरत आहे. एकिकडे रुग्णसंख्या वाढ असतानाच दुसरीकडे 2 हजार 812 कोरोनाबाधितांचा मृत्यूही झाला. 


महत्वाच्या बातम्या :