कर्ज बुडवल्याप्रकरणी विजय मल्ल्या अखेर फरार घोषित
एबीपी माझा वेब टीम | 14 Jun 2016 01:05 PM (IST)
मुंबई : देशभरातील प्रमुख बँकांना जवळपास 9 हजार कोटींचा चुना लावून लंडनमध्ये पळालेल्या विजय मल्ल्याला अखेर फरार घोषित करण्यात आलं आहे. ईडीच्या मागणीनंतर विशेष न्यायालयानं विजय हा निर्णय दिला. ईडीच्या कोणत्याही नोटीशीला भीक न घालणाऱ्या विजय मल्ल्याला फरार घोषित करण्याची मागणी ईडीनं विशेष न्यायालयात केली होती. प्रसारमाध्यमातून आपली बाजू मांडणारा विजय मल्ल्या तपास यंत्रणेपासून पळ काढत असल्याचं ईडीनं न्यायालयाला सांगितलं. ईडीची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयानं विजय मल्ल्याला फरार घोषित करण्याचा निर्णय दिला. धक्कादायक बाब म्हणजे तपास यंत्रणेच्या रडारवर असणाऱ्या विजय मल्ल्यानं चोरीछुपे कोट्यवधी रुपयांची संपत्ती विकल्याचं समजतंय.