अपघात झालेली खासगी बस मुजफ्फरपूरहून दिल्लीला जात होती. भरधाव वेगातील बसवरील ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं आणि ती डिव्हायडरला जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की त्यानंतर ही बस पलटली आणि यातच 16 जणांचा मृत्यू झाला.
या भीषण अपघातात 15 हून अधिकजण जखमी झाले असून अनेकजण गंभीर जखमी आहेत. अपघाताची भीषणता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघातातील प्रवाशांच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त केलं आहे.
तसंच जखमींवर योग्य उपचारांसाठीही रुग्णालयांना निर्देश दिले आहेत.