'गो-रक्षा याच्या नावाखाली भाजप नेते आणि आरएसएसशी संबंधित लोकं अल्पसंख्यांकांवर निशाणा साधत आहेत. हे सारं काही मतांसाठी सुरु आहे.' असा आरोप लालू प्रसाद यांनी केला.
दरम्यान, यावेळी लालू प्रसाद यांनी पंतप्रधान मोदींवरही टीका केली. 'निवडणुकीपूर्वी 56 इंचांची छाती सांगणारे आणि सर्जिकल स्ट्राईकनंतर स्वत:चीच पाठ थोपटून घेणाऱ्या मोदींनी याचंही उत्तर द्यायला हवं की, कशाप्रकारे पाकिस्तानी सैनिक भारतीय जवानांची हत्या करत आहेत.'
2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षातील कार्यकर्त्यांचे शिबिर बिहारमधील राजगीरमध्ये आयोजित करण्यात आले होते. यावेळी लालू प्रसाद सिंह यांच्यासह पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते.