रिझर्व्ह बँकेने राज्यातील सहकारी बँकांवर मार्च 1996 पासून 11 प्रकारचे निर्बंध लादले होते. ते निर्बंध आता रिझर्व्ह बँकेने उठवले आहेत. तसंच पुणे, नाशिक, नांदेड, कोल्हापूर, सोलापूर, बीड आणि धुळे या सात शहरात राज्य सहकारी बँकेच्या शाखा काढण्यास हिरवा कंदिल दाखवला आहे.
रिझर्व्ह बँकेच्या नव्या धोरणामुळे राज्यातील सहकारी बँकांच्या विस्ताराला मदत होणार आहे.