Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल

Parliament Session 2024 Live Updates Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत (PM Narendra Modi Rajya Sabha Speech.) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर दिलं.

नामदेव जगताप Last Updated: 03 Jul 2024 12:40 PM
पुढची पाच वर्षे गरिबीविरुद्धच्या लढासाईसाठी निर्णायक, देश नक्की विजयी होईल : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की येथे काही लोक बसले आहेत जे म्हणतात की यात काय आहे, हे होणारच आहे. त्यांना ऑटो पायलट मोडमध्ये सरकार चालवण्याची सवय आहे, वेटिंगवर विश्वास ठेवतात. मात्र आमचा आमच्या मेहनतीवर विश्वास आहे.सर्वसामान्यांना सन्मानाने जगण्यासाठी ज्या प्रकारची शासनाची गरज आहे, तसं शासन आम्ही देऊ. आगामी पाच वर्षे गरिबीविरुद्धच्या लढाईतील निर्णायक वर्षे आहेत. गरिबीविरुद्धच्या लढाईत हा देश विजयी होईल, हे मी १० वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर मोठ्या आत्मविश्वासाने सांगत आहे. जेव्हा देश जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनतो तेव्हा त्याचा परिणाम जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर होणार आहे. विस्तार आणि विकासाच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.

तिसऱ्यांदा जनादेश म्हणजे 10 वर्षांच्या कामगिरीवर मंजुरीचा शिक्का : PM Modi

पीएम मोदी म्हणाले की, ही निवडणूक केवळ गेल्या 10 वर्षांच्या कामगिरीवर मंजुरीचा शिक्का नाही तर भविष्यातील धोरणांवरही मान्यता देणारा शिक्का आहे. देशातील जनतेचा आमच्यावर पूर्ण विश्वास असल्याने आम्हाला संधी देण्यात आली आहे. गेल्या 10 वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेला 10 व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर नेण्यात यश आले आहे आणि जसजशी संख्या जवळ येत आहे तसतशी आव्हानेही वाढत आहेत. कोरोनाचा कठीण काळ आणि जागतिक संघर्षाची परिस्थिती असतानाही आम्ही सक्षम आहोत. आपल्या अर्थव्यवस्थेला १० व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर नेण्यात यश आले आहे.


यावेळी देशातील जनतेने भारताला पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेवर नेण्याचा जनादेश दिला आहे आणि मला विश्वास आहे की, जनतेने दिलेल्या जनादेशामुळे आपण भारताला पहिल्या तीन क्रमांकावर नेऊ.

जनतेने आम्हाला तिसऱ्यांदा संधी दिली, ती संधी विकसित भारताची, स्वावलंबी भारताची - पंतप्रधान मोदी

आज आपण 75 व्या वर्षात पदार्पण करत असताना जनउत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील जनतेने आपल्याला तिसऱ्यांदा संधी दिली आहे, ती संधी विकसित भारताची, स्वावलंबी भारताची ही वाटचाल स्वीकारून हा संकल्प पुढे नेण्याचा आशीर्वाद दिला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

संविधान हीच आपली सर्वांत मोठी प्रेरणा राहील : PM मोदी

२६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करू, असे आमच्या सरकारच्यावतीने लोकसभेत सांगण्यात आले, तेव्हा संविधानाची प्रत घेऊन उड्या मारणाऱ्यांनी आज २६ जानेवारी आहे, असा निषेध केला याचे मला आश्चर्य वाटले. आज संविधान दिनाच्या माध्यमातून शाळा-महाविद्यालयांमध्ये राज्यघटनेचा आत्मा आणि तिच्या निर्मितीतील भूमिका याविषयी चर्चा व्हावी, राज्यघटनेवरील विश्वासाची भावना व्यापकपणे जागृत व्हावी आणि संविधान हीच आपली सर्वांत मोठी प्रेरणा राहील, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असं मोदी म्हणाले.

PM Modi Live Rajya Sabha : संविधान आणि जनतेची मान्यता, त्यामुळेच आमच्यासारखे लोक इथपर्यंत

आमच्यासारखे लोक इथपर्यंत पोहोचण्याचे कारण म्हणजे संविधान आणि जनतेची मान्यता. आपल्यासाठी संविधान हा केवळ लेखांचा संग्रह नाही, तर त्याचा आत्माही खूप महत्त्वाचा आहे. कोणत्याही परिस्थितीत संविधान आपल्याला मार्गदर्शन करण्याचे काम करते, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

बाबासाहेबांच्या संविधानामुळे सामान्य माणूस महत्त्वाच्या पदावर पोहोचला : नरेंद्र मोदी

देशवासीयांनी गोंधळाचे, भ्रमाचे राजकारण नाकारले असून विश्वासाचे राजकारण मान्य केले आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. सार्वजनिक जीवनात माझ्यासारखे अनेक लोक आहेत ज्यांच्या कुटुंबातून सरपंचही झाले नाहीत आणि राजकारणाशीही संबंध नाही. पण आज ते महत्त्वाच्या पदावर पोहोचले आहेत. याचे कारण बाबासाहेबांनी दिलेले संविधान आहे.

भ्रम पसरवणाऱ्यांचं राजकारण देशवासीयांनी नाकारले - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भ्रम पसरवणाऱ्यांचं राजकारण देशवासीयांनी  नाकारले. विरोधकांना ही चपराक आहे. आमचं सरकार येऊन दहा वर्षे झाली, अजून २० वर्षे बाकी आहेत. 



 

पार्श्वभूमी

Parliament Session 2024 Live Updates Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर दिलं. लोकसभा सभागृहात काल विरोधकांच्या गदारोळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं निवेदन दिलं. यावेळी मोदींनी काँग्रेस आणि विशेषत: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर तुफान हल्ला चढवला होता. काँग्रेसचा उल्लेख परजीवी करत, मोदींनी राहुल गांधींवर निशाणा साधला. यावेळी विरोधकांनी वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी केली होती. दरम्यान, 18 व्या लोकसभा सत्राला 24 जूनपासून सुरुवात . लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची नियुक्ती झाली. 


पीएम मोदी आज राज्यसभेत धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देत आहेत. पीएम मोदी म्हणाले की, 60 वर्षांनंतर तिसऱ्यांदा सरकार आले आहे. सहा दशकांनंतर घडलेली ही घटना म्हणजे एक असामान्य घटना आहे. काही लोक मुद्दाम तोंड फिरवून बसले होते. गेल्या दोन दिवसांपासून मी पाहत आहे की, पराभवही स्वीकारला जात आहे, दबल्या मनाने विजयही  स्वीकारला जात आहे.


मी आमच्या काही काँग्रेस सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानू इच्छितो की जेव्हापासून निकाल आला तेव्हापासून, मी एका सहकाऱ्याच्या बाजूने पाहत आलो आहे. त्यांचा पक्ष त्यांना साथ देत नव्हता, तरीही तो एकटाच झेंडा घेऊन धावत होता.  आमच्या सरकारला 10 वर्षे झाली, अजून 20 वर्षे बाकी आहेत. आमच्या सरकारचा एक तृतीयांश पूर्ण झाला आहे, दोन तृतीयांश बाकी आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.