सरकारच्या नियंत्रणापूर्वी विवादित जमीन आपल्या ताब्यात होती, असा दावा निर्मोही आखाडा करत आला आहे. सुप्रीम कोर्टाने आज त्याबाबातचे पुरावे सादर करण्यास सांगितले. परंतु निर्मोही आखाड्याचे वकील कोणत्याही प्रकारचे पुरावे सादर करु शकले नाहीत.
शेकडो वर्षांपासून मंदिरावर तुमचे नियंत्रण होते, असे तुम्ही म्हणता, मग तुम्हाला दिवाणी खटल्यांच्या नियमांनुसार पुरावे सादर करावे लागतील, असे खंडपीठाने निर्मोही आखाड्याच्या वकिलांना सांगितले आहे.