यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी पंढरीच्या वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना प्रसाद म्हणून प्रत्येकी एक झाडाचे रोप भेट देण्याची सूचना केल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. परिणामी पावासाचं प्रमाणही घटलं आहे. त्यामुळे सरकारनं मोठ्या प्रमाणात वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण देण्यात आलं आहे.
दिल्ली दौऱ्यात सुधीर मुनगंटीवार यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचीही भेट घेतली. या भेटीनंतर चंद्रपुरात लवकरच दुसरं सैनिक स्कूल सुरु होणार आहे. तर मराठवाड्यात लष्कराची इको बटालियन सुरु होणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी यावेळी पत्रकारांना दिली.