आगामी लोकसभा निवडणुकीचा विचार करुन मोदी सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. वाढ केलेल्या महागाई भत्त्याचा 1 जानेवारी 2019 पासून याचा लाभ मिळणार आहे. 48.41 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 62.03 लाख निवृत्ती वेतनधारक मिळून तब्बल 1 कोटी 10 लाख 44 हजार लोकांना याचा फायदा होणार आहे.
आजच्या कॅबिनेट बैठकीत माध्यान्ह भोजन योजनेच्या नियमांमध्येदेखील सुधारणा करण्यात आली आहे. नव्या नियमांना कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. त्यामुळे वर्ष 2019-20 मध्ये या योजनेवर 12 हजार 54 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. अतिरिक्त रक्कम खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभाग देणार आहे.