Russian Ukraine War : मागील 12 दिवसांपासून रशिया-युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरु आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर तेथील अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. भारत सरकारने 'ऑपरेशन गंगा'अंतर्गत युक्रेनमधील विविध भागातून भारतीयांना मायदेशी आणले आहे. सोमवारी बुडापेस्टमधून सर्व विद्यार्थ्यांना मायदेशात आणले आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी या विमानासोबत आले आहेत.

  


बुडापेस्टमधून केंद्रीय मंत्री सहा हजार 711 विद्यार्थ्यांना घेऊन मायदेशात परतले आहेत. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी काही फोटोही पोस्ट केले आहेत. बुडापेस्टमधील अखेरच्या सहा हजार 711 विद्यार्थ्यांना घेऊन दिल्लीमध्ये दाखल झालो आहे. हे तरुण लवकरच आपल्या घरी पोहचलीत. लवकरच सर्वजण आपल्या आईवडिलांसोबत आणि कुटुंबासोबत असतील. त्यांच्या घरात आनंद आणि उत्साह असेल, असे ट्विट हरप्रीत सिंह पुरी यांनी ट्विट केले आहे.  










मागील आठवडाभरापासून ऑपरेशन गंगा अंतर्गत 16 हजार पेक्षा जास्त भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून मायदेशात आणले आहे. खारकीव्ह, सुमी येथून सर्वांना मायदेश आणण्यात आले आहे.


ऑपरेशन गंगा अंतर्गत चार मंत्र्यांवर जबाबदारी -
रशिया हल्ला केल्यानंतर युक्रेनमधील परिस्थिती नाजूक आणि भयावह झाली होती. युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थ्यी आणि नागरिक अडकले होते. येथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा अंतर्गत मोहिम राबवली होती. याची जबाबदारी चार मंत्र्यांवर सोपवली होती. ज्योतिरादित्य सिंधिया, हरदीप सिंह पुरी, किरेन रिजिजू आणि व्ही के सिंह यांना हंगेरी, रोमानिया, स्लोवाकिया आणि पोलांड येथे पाठवण्यात आले होते. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणण्याची जबाबदारी या चार मंत्र्यांवर होती. व्ही.के. सिंह यांच्यावर पोलांड,  हरदीप सिंह पुरी यांना हंगेरी, रोमानियाची जबाबदारी ज्योतिरादित्य सिंधिया आणि स्लोवाकियाची जबाबदारी किरेन रिजिजू यांच्यावर सोपवण्यात आली होती.