नवी दिल्ली : शिंदे गटाकडून आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) बहुमत चाचणीपूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिलेल्या राजीनामा, 16 आमदारांच्या अपात्रतेची नोटीस, अध्यक्षांच्या अविश्वासाची नोटीस यावरून न्यायालयात जोरदार युक्तीवाद पाहायला मिळाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राजीनामा, उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला का उपस्थित राहिले नाहीत? असे अनेक प्रश्न ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांनी उपस्थित केले.
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला त्यामुळे बहुमत ते बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत. मात्र आता त्यांचा राजीनामा अवैध ठरवला तर या चर्चेला अर्थ असेल. 'त्यामुळे उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला अर्थच उरत नाही, असा युक्तीवाद ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे यांनी केला आहे.
ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांच्या युक्तिवादातील दहा मुद्दे
- पक्षांतरबंदी कायद्यामुळे देशात पक्षांतर थांबलेलं नाही. कायदा पक्षांतरबंदीचा आहे, मतभेदांसाठी नाही. पक्षांतरबंदी कायद्यामुळे देशात पक्षांतर थांबलेलं नाही
- जर रेबिया प्रकरणाचा हवाला योग्य नसेल तर विरोधी पक्षांना याचिका मागे घ्यावी लागेल
- 21 जून रोजी विरोधी विरोधी पक्षांमध्ये नेतेपदाची रस्सीखेच सुरू होती
- उपाध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आला, होता पण तो पटलावर आला नाही. त्यामुळे उपाध्यक्ष काम करतच राहिले
- अविश्वास प्रस्तावानंतरही उपाध्यक्षांकडून सदस्यांना अपात्रतेची नोटीस
- उपाध्यक्ष त्या वेळी घेत असलेले निर्णय नियमबाह्य होते. नोटिशीला उत्तर देण्यासाठी पुरेसा वेळ दिला जात नव्हता
- उद्धव ठाकरेंना 30 जूनपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत होती. वेळ असतानाही त्यांनी राजीनामा का दिला
त्यामुळे उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला अर्थच उरत नाही - 288 पैकी 173 आमदार मविआकडे होते, केवळ 16 अपात्र ठरवले. त्यामुळे 16 आमदारांमुळे सरकार पडले नाही.
- स्वतः उद्धव ठाकरे यांनी परिस्थिती ओळखून राजीनामा दिला
- आणखी 22 आमदारांना अपात्र ठरवायचं होतं. त्यासाठी याचिकाही दाखल केली होती
राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर सात न्यायमूर्तींचं घटनापीठ निर्णय देणार की पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार याचा निर्णय कधी होणार याची प्रतीक्षा महाराष्ट्रासह देशालाही आहे. सध्या याबाबत सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद सुरू आहे. शिंदे गटाकडून आज बहुमत चाचणीपूर्वी उदधव ठाकरे यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर बोट ठेवलेलं आहे... शिंदे गटाकडून हरीश साळवे यांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :