Jodhpur Communal Clash : देशभर आज ईदचा सण साजरा केला जात आहे. परंतु, ईदच्या काही वेळ आधी म्हणजे सोमवारी रात्री उशिरा राजस्थानमधील जोधपूर शहरात धार्मिक तणाव निर्माण झाला होता. यावेळी झालेल्या दगफेकीत पाच पोलीस जखमी झाले होते. काही काळानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. परंतु, मंगळवारी सकाळी नमाज पठण झाल्यानंतर पुन्हा तेथे काही लोकांनी दगडफेक केली. त्यामुळे या भागात पुन्हा तणाव वाढला आहे.  या घटनेनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे. 


सोमवारी मध्यरात्री दोन गटात तणाव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोधपूरमधील हा वाद सोमवारी मध्यरात्रीनंतर सुरू झाला. अल्पसंख्यांक समाजातील काही नागरिकांनी जोधपूरमधील जालोरी गेट जवळ धार्मिक झेंडे फडकवले. चौकात बसवलेल्या स्वातंत्र्यसैनिक बालमुकुंद बिस्सा यांच्या पुतळ्यावर या नागरिकांनी झेंडा लावला. त्याला हिंदू समाजातील काही लोकांनी विरोध केला. याबरोबरच परशुराम जयंतीनिम लावलेल्या भगव्या ध्वजावरून दोन्ही समाजाचे लोक समोरासमोर आले. त्यानंतर याच तणावातून दोन्ही गटात मारामारी झाली. 


मंगळवारी पुन्हा दगडफेक
दोन्ही गटातील तणावानंतर पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. परंतु, यावेळी जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. यात पाच पोलीस जखमी झाले. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराची नाळकांडी फोडली. शिवाय अफवा रोखण्यासाठी मंगळवारी इंटनेट सेवा बंद ठेवली होती. मंगळवारी जोधपूर मधील जालोरी गेटजवळ ईदनिमित्त नमाज पठण करण्यात आले. नमाज पठण करण्यात आल्यानंतर काही समाज कंठकांनी याठिकाणी दगडफेक केली. त्यामुळे सोमवारी नियंत्रणात आलेली परिस्थिती पुन्हा चिघळली. या दगडफेकीत परिसरातील काही वाहनांचे मोठे नुकसान झाले. 


जोधपूरमधील अनेक भागात संचारबंदी 
जोधपूरमधील या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली आणि तणाव  निर्माण झालेल्या परिसरात संचारबंदी लागू करण्याच्या सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर परिसरातील काही भागांमधील इंटरनेट सेवा बंद करण्यासह दहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लावण्यात आली आहे. 


मुख्यमंत्र्यांचे शांततेचे आवाहन 
दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या तणापूर्ण परिस्थितीत नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. जोधपूरमधील घटना दुर्देवी असून लोकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांती राखावी. सर्वच समाजातील नागरिकांनी यासाठी प्रयत्न करावेत आणि कायद्याचे पालन करावे.  






महत्वाच्या बातम्या


Jodhpur : राजस्थानच्या जोधपूरमध्ये झेंडा लावण्यावरुन दोन गटात वाद, दोन्ही गटाकडून दगडफेक