India Coronavirus Updates : देश तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर उभा आहे. देशासह राज्यातही तिसऱ्या लाटेचं संकट घोंघावतंय. अशातच देशातील कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत उतार-चढाव दिसत आहेत. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 37,875 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच एका दिवसापूर्वी 31,222 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तसेच गेल्या 24 तासांत 369 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे,  39,114 रुग्ण काल दिवसभरात कोरोनामुक्त झाले आहेत. 


केरळात सर्वाधिक रुग्णांची नोंद 


केरळात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या 30 हजारांहून अधिक दैनंदिन रुग्णांची नोंद करण्यात येत होती. परंतु, मंगळवारी 25,772 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती, तर 189 रुग्णांचा मृत्यू झाला होता. राज्यात आतापर्यंत एकूण 42 लाख 53 हजार 298 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर मृतांचा आकडा 21,820 वर पोहोचला आहे. 


भारतातील कोरोनाची एकूण आकडेवारी


कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 30 लाख 96 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 41 हजार 411 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाबा म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 22 लाख 64 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांहून कमी आहे. एकूण 3 लाख 91 हजार 256 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. 


देशातील कोरोनाची सद्यस्थिती : 


कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 30 लाख 96 हजार 718
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 22 लाख 64 हजार 51
सक्रिय रुग्णांची एकूण आकडेवारी : तीन लाख 91 हजार 256
एकूण मृत्यू : चार लाख 41 हजार 411
एकूण लसीकरण : 70 कोटी 75 लाख 43 हजार लसीचे डोस 


राज्यात काल (मंगळवारी) 3, 898 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 86 रुग्णांचा मृत्यू


राज्यात काल (मंगळवारी) 3, 898 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 581  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 4 हजार 336  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 08 टक्के आहे. 


राज्यात काल (मंगळवारी) 86 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.  राज्यात सध्या 47 हजार 926 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 12,409 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (77), नंदूरबार (2),  धुळे (3), जालना (51), परभणी (60), हिंगोली (18),  नांदेड (28), अमरावती (76), अकोला (16), वाशिम (05),  बुलढाणा (84), यवतमाळ (2), नागपूर (72),  वर्धा (2), भंडारा (1), गोंदिया (5),  गडचिरोली (35) या 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. 


आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 51,59,364 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,93,698 (11.77 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,06,524 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,021  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


मुंबईत गेल्या 24 तासांत 353 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 


मुंबईत गेल्या 24 तासांत 353 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 404 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,24,898 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासांत दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 3718 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1266 दिवसांवर गेला आहे.