नवी दिल्ली : भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करुन 40 अतिरेक्यांचा खात्मा केला. भारताने सर्जिकल स्टाईक यशस्वी केल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय सीमा आणि एलओसीवर तणावपूर्ण वातावरण आहे.


भारत आणि पाकिस्तानमध्ये 3 हजार 323 किलोमीटर लांबीची सीमा आहे. जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरात अशा चार राज्यांपर्यंत भारत-पाकिस्तान सीमा पसरली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये 1225 किलोमीटर लांब सीमा आहे, ज्यातील 740 किलोमीटर नियंत्रण रेषा (LOC) आहे.

राजस्थानमध्ये 1037 किलोमीटर लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा आहे, तर गुजरातमध्ये 508 किलोमीटर लांब सीमा, पंजाबमध्ये 553 किलोमीटर लांब सीमा आणि जम्मू-काश्मीरमध्ये 740 किलोमीटर लांब नियंत्रण रेषा आहे.

485 किलोमीटर लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा जम्मू, सांबा आणि कठुआमध्ये आहे. ही सीमा कठुआ ते अखनूरपर्यंत पसरली आहे.

1972 मध्ये शिमला करारानुसार युद्धानंतर जो देश जिथपर्यंत होता, तिथेच राहून त्या जागेला नियंत्रण रेषा (LOC) संबोधलं गेलं. 740 किलोमीटर लांबीची सीमा नकाशावर आखण्यात आली.

संबंधित बातम्या :

होय, आम्ही LOC पार करुन अतिरेक्यांचा खात्मा केला : इंडियन आर्मी


चुकून नियंत्रण रेषा ओलांडलेला भारतीय जवान पाकच्या ताब्यात


वाघा बॉर्डरवरील बीटिंग रिट्रीट 2 ऑक्टोबरपर्यंत रद्द


पाकमधील भारतीय उच्चायुक्तांना पाक परराष्ट्र मंत्रालयाचं बोलावणं


मोदी आणि भारतीय जवानांकडून पितृपक्षात पाकचं श्राद्ध : राज ठाकरे


सर्जिकल स्ट्राईक: भारतीय जवान नेमके कसे घुसले?


भारत-पाक युद्ध झाल्यास… दोन्ही देशांची शस्त्रसज्जता किती?


सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय?


ही कारवाई उरी हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली, कुटुंबीयांची भावना


भारत कणखर, मोदींचा अभिमान, मुख्यमंत्र्यांचं ट्वीट


अभिनंदन मोदीजी… उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना फोन


काश्मीर मांगो गे तो चीर देंगे, भाजप कार्यालयाबाहेर जल्लोष


फोटो : भारतीय लष्कराचा अभिमान वाटतो: अक्षय कुमार


फोटो : सर्जिकल स्ट्राईक: असा घेतला उरीचा हल्ल्याचा बदला!


फोटो : भारत कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्जः डीजीएमओ