अहमदाबाद विमानतळावर साचलेल्या पाण्यामुळे रनवेवर विमानं उतरणं अशक्य होऊन बसलं आहे. त्यामुळे अनेक विमान सेवा रद्द कराव्या लागल्या आहेत.
मुसळधार पावसामुळे प्रशासनाने शाळांना सुट्टी घोषित केली आहे. शिवाय, पाणी साचत असल्याने उपाययोजनांकडेही लक्ष दिले जात आहे.
अहमदाबादमधील वस्त्राल, निकोल, वटवा, मनीनगर, चांदलोडिया, साबरमती यांसारख्या परिसरात पाणी साचल्याने लोकांना घराच्या बाहेर पडणंही कठीण झाले आहे.
एनडीआरएफची पथकं मदतकार्यासाठी अहमदाबादेत दाखल झाली आहेत.