श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये काल संध्याकाळपासून भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. अनंतनाग जिल्ह्यातील आवूरा गावात काल संध्याकाळी 5 वाजल्यापासून ही चकमक सुरु आहे.


पहलगामजवळ असलेलं अनंतनाग जिल्ह्यातील आवूरा गावात दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती सैन्याला मिळाली होती. त्यानुसार गावामध्ये सैन्यानं तपासणी सुरु केली. या तपासणीदरम्यान एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला. प्रत्यूत्तरादाखल सैन्यानंही गोळीबार केला. या गोळीबारात कुणीही जखमी झालं नाही. मात्र परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे.

दरम्यान घरात लपलेले हे दहशतवादी स्थानिक तरुण असल्याचं बोललं जात आहे. काल रात्री 8 वाजता अंधारामुळे सैन्यानं कारवाई थांबवली होती. मात्र आता सकाळी पुन्हा या दहशतवाद्यांविरोधात मोहिम सुरु करण्यात येणार आहे.