उत्तराखंड भूकंपानं हादरला, भारत-नेपाळच्या सीमेवरही भूकंपाचे धक्के
एबीपी माझा वेब टीम | 01 Dec 2016 11:39 PM (IST)
नवी दिल्ली: उत्तराखंडमध्ये नुकतेच भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. अद्यापपर्यंत कोणीतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. भारत-नेपाळ सीमेवर भूकंपाचे तीव्र धक्के बसल्याचं समजतं आहे. या भूकंपांची तीव्रता 5.2 रिश्टर स्केल एवढी होती. उत्तर भारतातील चंपावत, श्रीनगर, गढवाल, अल्मोडा येथेही भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला होता.