राज्यात गेल्या चार महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चारजणांचा मृत्यू झाला आहे, तर 700जण गंभीर जखमी झाले आहेत.
त्यामुळे वाढत्या भटक्या कुत्र्यांची संख्या अटोक्यात आणण्यासाठी, पलामधील थॉमस कॉलेजच्या ओल्ड स्टूडण्ट वेल्फेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी यासाठी थेट महापालिका अधिकाऱ्यांनाच ऑफर दिली आहे.
दरम्यान, यापूर्वीही या संघटनेने भटक्या कुत्र्यांना आवरण्यासाठी सर्वसामान्यांना कमी दरात एअर गन उपलब्ध करुन दिली होती.
''आम्ही राज्यातील ज्या महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची संख्या जास्त आहे, त्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बक्षीस देण्याची योजना बनवत आहोत. या योजनेनुसार, जे सर्वाधिक भटक्या कुत्र्यांच्या मुसक्या आवळण्याचे नेतृत्व करतील त्यांच्यासाठी ही लागू असेल. आमचा मुख्य उद्देश भटक्या कुत्र्यांपासून सर्वसामान्यांना संरक्षण मिळवून देण्याचा असल्याचे,'' या संघटनेचे महासचिव जेम्स पमबायकल यांनी सांगितलं.