प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्त्वात दलित स्वाभिमान संघर्ष रॅली
एबीपी माझा वेब टीम | 16 Sep 2016 12:34 PM (IST)
नवी दिल्ली : उनावमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत दलित स्वाभिमान संघर्ष रॅली काढण्यात आली आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला आहे. संसद मार्गावरील मोर्चात नरेंद्र मोदी मुर्दाबाद, आरएसएस मुर्दाबाद, गो रक्षक मुर्दाबादच्या घोषणा सुरु आहेत. तथाकथित गो रक्षकांच्या गुंडगिरीला तात्काळ आळा घालण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. दलितांवरील संघटित अत्याचाराविरोधात ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. दलितांवरील अत्याचाराला राष्ट्रीय स्वयंसेवक संघच जबाबदार आहेत. या रॅलीच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधणार आहे. याशिवाय राज्याराज्यांमध्ये आंदोलन करणार असून 2018 मध्ये आणखी मोठं आंदोलन उभं करुन, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.