P305 Rescue Operations LIVE : बार्ज P-305 वर 34 जणांचा मृत्यू
भारतीय नौदलाचं समुद्रात अडकलेल्यांसाठी मदत आणि बचावकार्य अजूनही सुरु आहे. बार्ज P-305 वरील 34 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 May 2021 12:53 PM
पार्श्वभूमी
मुंबई : तोक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका समुद्रात अडकलेल्या जहाजांना बसला आहे. भारतीय नौदलाचं समुद्रात अडकलेल्यांसाठी मदत आणि बचावकार्य अजूनही सुरु आहे. बार्ज P-305 वरील 34 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर...More
मुंबई : तोक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका समुद्रात अडकलेल्या जहाजांना बसला आहे. भारतीय नौदलाचं समुद्रात अडकलेल्यांसाठी मदत आणि बचावकार्य अजूनही सुरु आहे. बार्ज P-305 वरील 34 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईच्या समुद्रात अडकलेल्या बार्ज P-305 साठी नौदलाचं 'ऑपरेशन 707' सध्या सुरु आहे.तोक्ते चक्रीवादळामुळे दोन दिवसांपासून बार्ज P-305 चा नांगर तुटल्याने ते समुद्रात भरकटलं होतं. तेव्हापासून बार्ज P-305 वर अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या शोध आणि बचावासाठी नौदलाचं ऑपरेशन सुरु आहे. बार्जवरील 185 जणांची सुटका करण्यात आली. परंतु बेपत्ता असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी 34 जणांचे मृतदेह नौदलाच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चार मृतदेह आणले असून उर्वरित मृतदेह दुपारपर्यंत आणण्यात येतील असं समजतं. या मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यांची ओळख पटवून मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात येतील. तर उर्वरित बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचं काम नौदलाकडून सुरु आहे.समुद्रात अडकलेल्या बार्ज P-305 नौकेवर एकूण 261 कर्मचारी अडकले होते. त्यापैकी 184 कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका करण्यात आली. तर 77 जण बेपत्ता होते. या बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेतानाच नौदलाच्या हाती 13 मृतदेह लागले. दरम्यान नौदलाचं शोध आणि बचावकार्य सुरुच राहणार आहे. आयएनएस तेग, आयएनएस बेट्वा, आयएनएस बीस, P8I विमान आणि सीकिंग हेलिकॉप्टरच्या मदतीने शोधमोहीम सुरु आहे. तर आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकाता आज मुंबई बंदरात परतणार आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
18 जणांचे मृतदेह घेऊन INS कोलकाता मुंबईच्या बंदरावर परतणार
18 जणांचे मृतदेह घेऊन lNS कोलकाता मुंबईच्या बंदरावर परतणार आहे. तोक्ते चक्रीवादळामुळे बार्ज P-305 वरील 184 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली. तर बेपत्ता 77 पैकी 34 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.