Covid-19 Cases LIVE : कोरोनामुळे चिंता वाढली! परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR चाचणी अनिवार्य; कोरोना संदर्भातील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...
Coronavirus LIVE Updates : जगात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला आहे. भारतातही प्रशासन अलर्ट मोडवर आलं असून खबरदारी घेतली जात आहे. या संदर्भातील प्रत्येक अपडेट या लाईव्ह ब्लॉगमध्ये जाणून घ्या.
India COVID-19 Travel Rules : परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची RT-PCR चाचणी केली जाईल. तसेच चीन, जपान, कोरियामधून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग केले जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. मांडविया यांनी सांगितलं की, 'चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड येथून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी अनिवार्य असेल. विमानतळावर या प्रवाशांमध्ये कोविड 19 ची लक्षणे आढळल्यास किंवा कोविड चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास प्रवाशांना क्वारंटाईन केलं जाईल.'
Coronavirus Cases in India : देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 4,46,76,515 झाली आहे. तसेच, 21 डिसेंबर रोजी कोरोनाचे नवीन 131 रुग्ण आढळले आणि तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोना चाचणीत लक्षणीय घट झाल्याचं दिसून येत आहे. 22 डिसेंबर रोजी देशात कोरोना विषाणूचे 185 रुग्ण आढळले होते. त्यानंतर
Coronavirus Cases in India : आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. केरळमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून आजपर्यंत भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5 लाख 30 हजार 691 आहे. देशातील दैनंदिन रुग्ण सकारात्मकतेचे प्रमाण 0.15 टक्के आणि साप्ताहिक रुग्ण सकारात्मकता दर 0.14 टक्के आहे.
Corona Cases in India : जुलै महिन्यापासून देशात कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले होते. आठवडाभरात कोरोनाचे 1,200 पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात 14 ते 23 डिसेंबरपर्यंत म्हणजेच 10 दिवसांत कोरोनाचे 1,566 रुग्ण आढळले आहेत. सध्या देशात एकूण 3,397 सक्रिय प्रकरणे आहेत.
Coronavirus Cases in India : आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. केरळमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून आजपर्यंत भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5 लाख 30 हजार 691 आहे. देशातील दैनंदिन रुग्ण सकारात्मकतेचे प्रमाण 0.15 टक्के आणि साप्ताहिक रुग्ण सकारात्मकता दर 0.14 टक्के आहे.
Cororna Updates in India : जगभरात सध्या कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. भारतातही ओमायक्रॉनच्या BF.7 व्हेरिंटचे चार रुग्ण आढल्याने प्रशासन सतर्क झालं आहे. केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. काही राज्यांनी मास्कसक्ती लागू केली आहे. देशात शुक्रवारी देशात कोरोनाचे 163 नवीन रुग्ण आढळले होते तर, कोरोनामुळे गेल्या 24 तासात 6 जणांना आपला जीव गमवावा लागला असून, त्यानंतर एकूण मृतांचा आकडा आता 5 लाख 30 हजार 690 वर पोहोचला आहे.
Covid 19 in India : जगभरात पुन्हा एकदा कोरोनाची लाट पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकार अलर्टवर असून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. गेल्या 24 तासांत म्हणजे देशात 201 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह देशात आतापर्यंत कोरोना संसर्घ झालेल्या रुग्णांची संख्या 4 कोटी 46 लाखांच्या पार गेली आहे. देशात सध्या 3,397 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी नवीन आकडेवारी जारी केली आहे.
Coronavirus Updates : केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णाचे सँपल जीनोम टेस्टिंगसाठी पाठवण्यात येणार आहे. यातून जीनोम सिक्वेन्सिंग होऊ शकेल आणि जर कोरोनाचा नवा व्हेरियंट सापडला तर त्याला ट्रॅक करता येऊ शकेल.
भारतामध्ये ओमायक्रॉनच्या (Omicron) BF.7 या सबव्हेरियंटचे (BF.7 Variant) चार रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे भारत सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. केंद्र सरकार देशातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेऊन असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
Coronavirus Updates : जागतिक स्तरावर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा विचार करता देशातील सर्व राज्यांनी सतर्क राहिलं पाहिजे, आरोग्य व्यवस्थापनेसंबंधित सर्व तयारी केली पाहिजे असे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी दिले आहेत. या संदर्भात राज्यांनी केंद्राशी समन्वय साधून एकभावनेनं काम केलं पाहिजे असंही ते म्हणाले.
India Covid-19 Udapte : चीनमधील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार सतर्क झाले आहे. सरकारकडून मार्गदर्शक सूचनाह जारी करण्यात आल्या आहेत. आजपासून भारतात आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कोविड चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची आजपासून रँडम कोविड टेस्ट केली जाणार आहे. फ्लाइटच्या एकूण प्रवाशांपैकी दोन टक्के प्रवाशांची रँडम कोविड टेस्ट देखील केली जाईल.
Aurangabad Corona Update : चीनमध्ये कोरोनाचा थैमान (China Covid Outbreak) पाहायला मिळत असून, दिवसेंदिवस तेथील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरम्यान चीनमध्ये एकाच दिवसात 3.7 कोटी कोरोना रुग्णांची भर (Corona patients increased) पडल्याच्या एका अहवालाने खळबळ उडाली आहे. त्यामुळे भारतात देखील आरोग्य यंत्रणा अलर्ट (Health Department Alert) झाली आहे. याचवेळी औरंगाबाद जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणादेखील सतर्क झाली असून, कोरोना चाचण्या (Corona Test) वाढवण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले आहे. याबाबत औरंगाबाद जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर शेळके यांनी पत्र काढले आहे.
तुळजाभवानी मंदिरात येणाऱ्या भाविकांना मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. भाविकांनी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खालील सुचनांचे तंतोतंत पालन करावे.
1) मंदिर आणि मंदिर परिसरात तसेच सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क वापरण्यात यावेत.
2) सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात यावे.
3) आपले हात नियमित साबनाने अथवा सॅनिटयझरने स्वच्छ ठेवण्यात यावेत.
4) अंतरराष्ट्रीय प्रवास टाळावा.
5) जर आपणास ताप, खोकला, सर्दी, संडास, उल्टी, डोकेदुखी आणि सांधेदुखी या आजारांचा त्रास होत असल्यास तात्काळ दावाखन्यास भेट देऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
6) शासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे.
सोलापूर : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात मास्क सक्ती
दर्शनासाठी स्वामी भक्तांनी मास्क घालूनच मंदिरात दर्शनास येण्याचं मंदिर समितीने भक्तांना केलं आवाहन
वाढत्या कोविडच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीतर्फे खबरदारीचा उपाय म्हणून घेतला निर्णय
नाताळ आणि वर्षाखेर निमित्त सुट्टी असल्याने अनेक भाविक दर्शनाला येतात
त्यामुळे भाविकांना खबरदारी घेण्याचे आवाहन, मंदिर समितीने स्वतःहून वाटप केले आहेत मास्क
मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांची माहिती
Coronavirus Updates : नागरिकांसाठी बीएमसीच्या विशेष सूचना
नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क लावावे.
सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे.
वेळोवेळी हात व्हावे व स्वच्छता बाळगावी.
आजारी वाटल्यास किंवा लक्षणे जाणवल्यास घरी थांबावे.
ज्येष्ठ नागरिक त्यासोबतच डायबिटीक किंवा हायपर टेन्शन रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे
सर्व नागरिकांनी लसीकरण पूर्ण करून बूस्टर डोस घ्यावा.
मुंबईत ट्रेसिंग टेस्टिंगचे प्रमाण वाढवावे. मुंबई महापालिका मोठ्या प्रमाणावर लसीकरणावर लक्ष केंद्रित करत आहे. कोरोना रुग्णांसाठी विशेष रुग्णालय, बेड्स, ऑक्सिजन बेड्सची सोय केली जाईल. सध्या मुंबईत कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी बीएमसीचे सेव्हन हिल आणि कस्तुरबा रुग्णालय कार्यरत आहेत. तर कामा रुग्णलय, सेंट जॉर्ज रुग्णालय ,टाटा रुग्णालय, जगजीवन राम रुग्णालय हे राज्य सरकारी रुग्णालय व इतर खाजगी 26 रुग्णालयं हे कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आहेत, असं महापालिकेनं सांगितलं आहे.
Mumbai Corona Virus Updates : जागतिक स्तरावर कोरोनाच्या (Corona Cases Updates) वाढत्या प्रादुर्भावानंतर राज्य सरकार देखील सतर्क झालं आहे. राज्याची राजधानी मुंबईत देखील या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगली जात आहे. मुंबई महापालिकेने एक प्रेस नोट जारी करत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष सूचना आणि गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. मुंबई महापालिकेनं कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी सूचना (Mumbai Corona Virus Updates Guideline of Bmc )देण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी कोव्हिड संदर्भातील सूचनांचे पालन करावे, असं आवाहन देखील पालिकेकडून करण्यात आलं आहे.
जागतिक स्तरावर कोरोनाच्या (Corona Cases Updates) वाढत्या प्रादुर्भावानंतर केंद्र सरकार सतर्क झालं आहे. देशातील सर्व राज्यांनी सतर्क राहिलं पाहिजे, आरोग्य व्यवस्थापनेसंबंधित सर्व तयारी केली पाहिजे असे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी दिल्यानंतर ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कोव्हिड नियमांचे पालन करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना पत्र लिहित केल्या आहेत.
चीन आणि इतर देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतात विमानतळांवर प्रवाशांची कोविड-19 चाचणा करण्यात येईल. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली आहे.
पार्श्वभूमी
Coronavirus Updates in India : जगभरात कोरोना विषाणूचा पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे. कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट आणि त्याचे सब व्हेरियंट BF.7 आणि BF.12 यांचा संसर्ग वेगाने पसरत असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतातही ओमायक्रॉनचे चार रुग्ण आढळल्याने चिंतेचं वातावरण आहे. जगभरात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता प्रशासन हाय अलर्टवर आहे. केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्रालयाकडून सर्तकतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचं जीनोम सिक्वेंसिंग करण्याचं आवाहन केंद्राने राज्यांना केलं आहे. विमानतळावर परदेशी प्रवाशांची चाचणी आणि सॅम्पलिंसग केलं जात आहे. कोविड-19 (Covid-19) च्या सध्याच्या परिस्थितीवर नॅशनल टास्क फोर्स प्रमुख आणि नीति आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल यांनी सांगितलं आहे की, भारतीयांना घाबरण्याचं काही कारण नाही, सरकारकडून योग्य खबरदारीचे उपाय केले जात आहेत.
वाढत्या प्रादुर्भावानंतर केंद्र सरकार सतर्क झालं आहे. देशातील सर्व राज्यांनी सतर्क राहिलं पाहिजे, आरोग्य व्यवस्थापनेसंबंधित सर्व तयारी केली पाहिजे असे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी दिल्यानंतर ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कोव्हिड नियमांचे पालन करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना पत्र लिहित केल्या आहेत.
केंद्राकडून आलेली नियमावली पाळण्याच्या सूचना देखील केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिल्या आहेत. इन्फ्ल्यूएन्झा आणि सारीच्या गंभीर केसेसची देखील कोव्हिड चाचणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. चाचणी किट मुबलक प्रमाणात मुबलक आहेत की नाही याची काळजी घेण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. महाराष्ट्राच्या सचिवांना देखील हे पत्र मिळालं असून आता सणासुदीच्या दिवसांत सतर्क राहण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य खात्याकडून करण्यात आलं आहे.
महाराष्ट्रात कोविड परिस्थिती नियंत्रणात
जगातील कोरोनाच्या (Corona Cases Update) उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करतानाच सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे मुख्य सचिवांनी देखील तातडीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून कोविड अनुरूप वर्तन पंचसुत्रीचे काटेकोर पालन होईल, हे पाहण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज दिले.
बूस्टर डोस घेण्याचं आवाहन
कोरोनाने पुन्हा चीनसह जगभरातील अनेक देशांमध्ये खळबळ उडाली आहे. इटली, अमेरिका, दक्षिण कोरिया, ब्राझील या देशांमध्ये कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक नवीन अॅडव्हायजरी जारी केली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच मास्क घालण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच ज्या नागरिकांनी आतापर्यंत बूस्टर डोस घेतलेला नाही, त्यांनी लवकरात लवकर डोस घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -