नवी दिल्ली :  सध्या देशाबरोबरच राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. कोरोनाच्या संख्या  कमी होत असल्याने राज्य कोरोनावरील कडक निर्बंधांबाबत पुर्नविचार करु शकते आणि अनावश्यक निर्बंध दूर करुन दिलासा देऊ शकतात, अशा आशयाचे पत्र केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याच्या सचिवांना लिहिले आहे.  मात्र असं असलं तरी राज्याने हे सुनिश्चित करावे की सर्वत्र कोरोना प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश देखील त्यांनी या वेळी दिले आहे. 


राजेश भूषण आपल्या पत्रात म्हणाले की,  राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून दैनंदिन आकडे देखील कमी येत आहे. जगातील देखील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने 10 फेब्रुवारीपासून आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी 10 फेब्रुवारीपासून नवे नियम लागू केले आहे. सरकारच्या नव्या नियमावलीनुसार विदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी क्वारंटाईनचे बंधन नसणार आहे.




पुढे आपल्या पत्रात म्हणाले की, सुरूवातीच्या काळात कोरोनाची वाढती सख्या पाहता अनेक राज्यांनी विमानतळांवर  आणि राज्यातील सीमांवर निर्बंध लावण्यात आले होते. दरम्यान  जिथे कोरोना महामारीच्या काळात आरोग्य व्यवस्था हातळण्याबरोबरच राज्याचे अर्थचक्र न थांबता कसे सुरळीत चालेल याची देखील काळजी घेणे गरजेचे आहे. 


केंद्रीय आरोग्य सचीव म्हणावे, सध्याच्या परिस्थितीत देशातील कोरोनाची संख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यांनी कोरोनाची परिस्थिती पाहून निर्बंध शिथिल करावे. मात्र असे करत असताना राज्याने हे सुनिश्चित करावे की सर्वत्र कोरोना प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी करण्याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी पाच टप्प्याचे धोरणाची देखील अंलबजावणी करता येऊ शकते. यासाठी राज्य टेस्ट, ट्रॅक, ट्रीट, वॅक्सीनेशन आणि कोरोना अनुरुप व्यवहार यासारखे नियम लावण्यात येऊ शकतात. 


संबंधित बातम्या :


Coronavirus : गेल्या 24 तासात देशात 30 हजार 615 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 514 जणांचा मृत्यू