Coronavirus Cases Today : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरस (Covid-19) चा प्रादुर्भाव अद्याप सुरुच आहे. देशात दैनंदिन रुग्णांचा आकडा कमी झालेला असला तरी गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 11 हजार 903 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अशातच काल 311 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या आकड्यात वाढ झाली असून देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा एकूण आकडा 4 लाख 59 हजार 191 वर पोहोचला आहे. जाणून घेऊया कोरोनाची सद्यस्थिती... 


सक्रिय रुग्णांची संख्येत घट 


केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 14 हजार 159 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या एक लाख 51 हजार 209 वर पोहोचली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, 252 दिवसांनी सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 36 लाख 97 हजार 740 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 


राज्यात मंगळवारी 1078 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 48 जणांचा मृत्यू


कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 1,078 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 095  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 53  हजार 581 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.59 टक्के आहे. 


 राज्यात आज 48 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 3204 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (10), नंदूरबार (2),  धुळे (1), जालना (20), बीड (62),  लातूर(87),  परभणी (37), हिंगोली (20), नांदेड (23),  अकोला (16), अमरावती (17),  वाशिम (02), अकोला (17), बुलढाणा (07), नागपूर (67), यवतमाळ (05), वर्धा (7), भंडारा (2), गोंदिया (2),  चंद्रपूर (18) गडचिरोली (3) या  जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.


राज्यात सध्या 15 हजार 485  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 1,91,497 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 919  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 28 , 43, 792 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


कोराना मृत्यूंपेक्षा भारतात आत्महत्यांमुळं मृत्यूची संख्या अधिक


चांगल्या आरोग्याचा अर्थ फक्त निरोगी शरीर नव्हे. यामध्ये मानसिक आरोग्याचाही (Mental Health) समावेश होतो. कोरोना महामारीच्या (Coronavirus Pandemic)   काळात तो व्यक्ती प्रत्येक लढाई जिंकतो. ज्याला आपलं मन मजबूत कसं करायचं माहित असतं. मात्र, ज्याचं मन कमकुवत असतो, तो एकतर थकतो अन्यथा पराभव मान्य करतो. आयुष्यात निराशा येते. त्यानंतर टोकाचं पाऊल उचललं जाते. अन् आयुष्य संपवतात. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (National Crime Records Bureau) आकडेवारीत धक्कादायक आकडे समोर आले आहेत. वर्षभरात कोरोना महामारीपेक्षा जास्त मृत्यू आत्महत्यानं झाल्याचं या आकडेवारीवरुन समोर आलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :