निवडणुकीमध्ये पहिलं उद्दिष्ट भाजप-संघाच्या विचारधारेला हरवणं आहे. पंतप्रधानपदाचा विचार नंतर होईल, असं राहुल गांधींचं मत आहे.
शिवसेना आणि काँग्रेस अजिबातच समविचारी नाही. त्यामुळे सेनेसोबत काँग्रेसची युती शक्य नाही, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचं सूत्रांनी सांगितलं. विरोधीपक्षांची मोट बांधून मोदींचा पराभव करण्याकडे काँग्रेसचा कल आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीसोबतच काँग्रेस आघाडी करणार आहे.
भाजप 230 जागा जिंकलं तरी नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत, भाजपमधून दुसरं कोणीतरी पंतप्रधान होईल, असं राहुल गांधींना वाटत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात भाजपच्या जवळपास 100 जागा कमी होतील. कारण या ठिकाणी आम्ही युती करत आहोत, असं काँग्रेस म्हणतं. यूपीमध्ये समाजवादी पक्ष, बसप आणि इतर विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न आहेत.
मतदान यंत्रांमध्ये जेव्हा गडबड होते, तेव्हा त्याचा फायदा फक्त भाजपलाच होतो इतर पक्षांना कधीच होत नाही, अशीही शंका काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आली.