Congress Protest LIVE Updates : महागाईविरोधात काँग्रेसचं देशव्यापी आंदोलन, दिल्लीत जमावबंदी लागू, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

Congress Protest : आज काँग्रेसचं महागाई आणि बेरोजगारीविरोधात देशव्यापी आंदोलन आहे. काँग्रेस कार्यकर्ते पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालणार आहेत. यासंबंधित प्रत्येक अपडेट येथे पाहा.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Aug 2022 01:17 PM
मुंबईसह दिल्लीमध्ये काँग्रेस नेत्यांची धरपकड

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) ताब्यात घेतलं आहे. महागाई, बेरोजगारीविरोधात काँग्रेसचं देशभरात आंदोलन सुरु आहे.





पोलिसांकडून काँग्रेस नेत्यांची धरपकड सुरुच



प्रियंका गांधी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात



राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी यांचा आंदोलनात सहभाग



राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी यांचा आंदोलनात सहभाग

राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी यांचा आंदोलनात सहभाग

महागाई, बेरोजगारीवर बोलतो म्हणून कारवाई- राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी लाईव्ह

Pune: पुण्यात कॉंग्रेसचं महागाई विरोधात आंदोलन

Pune:  आज (5 ऑगस्ट) महागाई (Inflation) आणि बेरोजगारीविरोधात (Unemployment) देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. पुण्यात देखील मोठ्या प्रमाणात कॉंग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होत हे आंदोलन केलं आहे. सातारा रोडवर हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्याही मोठ्या प्रमाणात उपस्थित झाल्या होत्या. महागाई विरोधात घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आलं.

दिल्ली पोलिसांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना ताब्यात घेतलं, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक



काँग्रेस नेते राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात...



काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

राहुल गांधीच्या नेतृत्वात काँग्रेसचं आंदोलन, पोलिसांकडून नेत्यांची धरपकड



राहुल गांधीच्या नेतृत्वात काँग्रेसचं आंदोलन, पोलिसांकडून नेत्यांची धरपकड



काँग्रेसचं मुंबई, दिल्लीसह नागपुरात आंदोलन



ईडी कारवायांचा काँग्रेसकडून निषेध



राहुल गांधीच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात

काँग्रेस नेत्यांना आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवले

Congress Protest LIVE Updates : काँग्रेस नेत्यांना आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवले आहे

देशात ईडीच्या दहशतीचं वातावरण : अशोक गेहलोत

देशात ईडीची दहशत असल्याची थेट टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी यावेळी केली. बेरोजगारीनं देशात हाहाकार माजला आहे. सरकारच्या विरोधात बोलणारांची गळचेपी करण्यात येत असल्याचंही गेहलोत म्हणाले.  अशोक गेहलोत म्हणाले की, देशात संविधानाची पायमल्ली केली जात आहे. देशात ईडीच्या दहशतीचे वातावरण आहे. देशात अतिशय धोकादायक खेळ सुरू आहे.  माध्यमांनी आज धैर्य दाखवण्याची गरज आहे. आज जर आपण गप्प बसलो तर इतिहास आपल्याला माफ करणार नाही, असं गेहलोत म्हणाले.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

राजभवनावर मोर्चा काढण्याआधी काँग्रेस नेते पोलिसांच्या ताब्यात



मुंबईतील काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

मुंबईत काँग्रेस नेत्यांची धरपकड सुरु

Congress Protest LIVE Updates : विधानभवनातून बाहेर पडू न दिल्यामुळे आता काँग्रेसकडून विधानभवन गेटवर आंदोलनाला सुरूवात

Congress Protest LIVE Updates : विधानभवनातून बाहेर पडू न दिल्यामुळे आता काँग्रेसकडून विधानभवन गेटवर आंदोलनाला सुरूवात केली आहे

मुंबईतील काँग्रेस कार्यकर्त्यांना नोटीस

ईडीच्या कारवाईबाबत राहुल गांधींची प्रतिक्रिया, म्हणाले...

ईडीच्या कारवाईबाबत राहुल गांधी म्हणाले की, जेवढं मी बोलेन, तेवढी माझ्यावर कारवाई केली जाईल. पण मी घाबरत नाही. आता माझ्यावर आणखी हल्ले होतील. जो धमकावतो तो घाबरत असतो. या लोकांना भारताच्या आजच्या परिस्थितीची भीती वाटते. त्यांनी दिलेल्या आश्वासनांची त्यांना भीती वाटते. लोकांच्या ताकतीला घाबरतात. महागाई आणि बेरोजगारीची भीती या लोकांना आहे. हे लोक 24 तास खोटे बोलण्याचे काम करतात, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं.

Congress Protest LIVE Updates : काँग्रेस नेते संजय निरुपम आणि कार्यकर्ते ताब्यात; जुहूमधून ताब्यात घेत वर्सोवा पोलीस स्टेशनला नेलं

महागाई, बेरोजगारीविरोधात काँग्रेस आक्रमक, विधानभवनाबाहेर पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना अडवलं

पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना अडवलं

काँग्रेस नेत्यांनी विधानभवनाबाहेर पडू नये, पोलिसांची मागणी

विधिमंडळासमोर काँग्रेस नेते आणि पोलीस आमनेसामने

विधिमंडळासमोर काँग्रेस नेते आणि पोलीस आमनेसामने आले आहेत. राजभवनावर मोर्चा काढण्याचा इशारा काँग्रेसनं दिला आहे.





मुंबई काँग्रेसकडून राजभवनावर मोर्चा काढण्याचा इशारा

 



'विरोधकांना पाठिंबा देणाऱ्यांच्या मागे ईडी आणि सीबीआय'

राहुल गांधी म्हणाले की, आम्ही एका राजकीय पक्षाशी लढत नाहीत तर आम्ही संपूर्ण पायाभूत सुविधांशी लढत आहोत. राहुल गांधी म्हणाले की, जर कुणी विरोधकांना पाठिंबा देत असेल तर त्याच्या मागे ईडी आणि सीबीआय लावले जाते. त्यामुळे विरोधकांचा प्रभाव दिसत नाही. महागाईबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, अर्थमंत्र्यांना महागाई का दिसत नाही हेच कळत नाही.  ते म्हणतात स्टार्टअप इंडिया आहे, सांगा कुठे आहे स्टार्टअप इंडिया. लोकांना नोकरीवरुन काढलं जात आहे. सरकारचं म्हणणं आहे की, कोरोनामध्ये एकही मृत्यू झाला नाही. 5 दशलक्ष लोक मरण पावले असे संयुक्त राष्ट्र म्हणत आहे, परंतु सरकार म्हणत आहेत की हे सर्व खोटे आहे. बेरोजगारीबाबत सरकार म्हणते की यात तथ्य नाही. त्यांच्या हातात सगळी संवादाची साधनं आहेत, असंही ते म्हणाले.  

देशात चार लोकांची हुकुमशाही, लोकशाहीची हत्या सुरु : राहुल गांधी

देशात लोकशाहीची हत्या सुरु आहे. देशामध्ये चार लोकांची हुकुमशाही सुरु आहे. सध्या देशातील परिस्थिती भयानक आहे. आम्हाला फक्त अटक केलं जात आहे.  काँग्रेसनं जे 70 वर्षात कमावलं ते भाजपनं 7 वर्षात गमावलं आहे, अशी टीका काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली आहे. काँग्रेसने आज महागाई (Inflation) आणि बेरोजगारीविरोधात (Unemployment) देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. काँग्रेसने महागाई आणि बेरोजगारीबाबत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या आंदोलनाआधी राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

देशात चार लोकांची हुकुमशाही, लोकशाहीची हत्या सुरु : राहुल गांधींचा

देशात लोकशाहीची हत्या सुरु आहे. देशामध्ये चार लोकांची हुकुमशाही सुरु आहे. सध्या देशातील परिस्थिती भयानक आहे. आम्हाला फक्त अटक केलं जात आहे.  काँग्रेसनं जे 70 वर्षात कमावलं ते भाजपनं 7 वर्षात गमावलं आहे, अशी टीका काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली आहे. काँग्रेसने आज महागाई (Inflation) आणि बेरोजगारीविरोधात (Unemployment) देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. काँग्रेसने महागाई आणि बेरोजगारीबाबत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या आंदोलनाआधी राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

महागाईवरून काँग्रेस आक्रमक, केंद्र सरकारविरोधात देशव्यापी आंदोलन

आज काँग्रेसचं महागाई आणि बेरोजगारीविरोधात देशव्यापी आंदोलन आहे. काँग्रेस कार्यकर्ते पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालणार आहेत. 

पार्श्वभूमी

Congress Protest : काँग्रेसने (Congress) आज (5 ऑगस्ट) महागाई (Inflation) आणि बेरोजगारीविरोधात (Unemployment) देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. इतकेच नाही तर काँग्रेस कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दिल्लीतील निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न करणार आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी करत आहे. या मुद्द्यावरुन संसदेत सरकारला घेरण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. तर एक पाऊल पुढे जात काँग्रेसने महागाई आणि बेरोजगारीबाबत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर आक्रमक भूमिका घेतली आहे.


काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी (4 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेत 'मी मोदींना अजिबात घाबरत नाही. सत्य दडपता येत नाही. तुम्हाला जे करायचे आहे ते करा, पण सत्याला आळा घालता येत नाही," असं म्हटलं होतं.


दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली
काँग्रेसच्या मुख्यालयात गुरुवारी रात्रीपासूनच काँग्रेस कार्यकर्ते जमू लागले. मात्र, दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिलेली नाही. "जंतर-मंतर वगळता, नवी दिल्ली जिल्ह्यातील संपूर्ण भागात CrPC कलम 144 लागू आहे. सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्था, रहदारीच्या कारणांमुळे 5 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली जिल्ह्यातील परिसरात आंदोलन/धरणे/घेरावाला परवानगी देता येणार नाही," असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं. दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारल्याने राहुल गांधी म्हणाले होते की, "लोकशाहीत आंदोलन करणे हा आमचा अधिकार आहे. पोलीस परवानगी देत ​​नाहीत, ठीक आहे, रोखून दाखवा."


राष्ट्रपती भवनावर मोर्चा, पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव
काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी सांगितलं की, "वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लादल्याच्या विरोधात काँग्रेस दिल्लीत निदर्शने करणार आहे. याशिवाय राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढणार असून पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव देणार आहोत." काँग्रेसचे लोकसभा आणि राज्यसभा खासदार संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढणार आहेत.


तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी म्हणाले की, "आम्ही राष्ट्रपती भवनावरील मोर्चासाठी परवानगी मागितली आहे आणि पक्षाच्या 80 हून अधिक खासदारांना तिथे शांततेने जाण्याची परवानगी दिली जाईल अशी अपेक्षा आहे. तसंच पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेरावही घातला जाणार आहे, ज्यामध्ये CWC सदस्य आणि वरिष्ठ नेते सहभागी होतील. 


राज्यांमध्ये 'राजभवन घेराव' असेल
दिल्लीत राष्ट्रपती भवनावर मोर्चा तर विविध राज्यात राजभवनाला घेराव घालण्यास काँग्रेसने सांगितलं आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने 5 ऑगस्ट रोजी 'राजभवन घेराव' आयोजित करण्यास सांगितलं आहे, ज्यात आमदार, विधानपरिषदेचे सदस्य, माजी खासदार आणि राज्य युनिटचे वरिष्ठ नेते सहभागी होतील.


जिल्हा मुख्यालयावर निदर्शने, धरपकड
पंचायतीपासून ते जिल्हास्तरापर्यंत काँग्रेसचे लोकप्रतिनिधी जिल्हा मुख्यालयावर आंदोलन करुन जेलभरो करतील, असा निर्णयही पक्षाने घेतला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.